‘ते’ 19 बंगले कुठे गायब झाले ते सांगा; सोमय्यांचे उद्धव ठाकरेंना खुले आव्हान

191

भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरेंसह संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल केला आहे. किरीट सोमय्या म्हणाले की, उद्धव ठाकरे मला तोत-या म्हणातात. पण या तोत-याने तुमच्या बायकोचे एकोणवीस बंगले कुठे गायब केले ते द्या. या तोत-याचा महाराष्ट्राला अभिमान आहे. मी उद्धव ठाकरे यांनी खुले आव्हान देतो की, ज्या शिव्या द्यायच्या आहेत त्या द्या, पण एकोणवीस बंगले गेले कुठे ते सांगा ना? असा सवालच किरीट सोमय्या यांनी उपस्थित केला आहे.

( हेही वाचा: ‘श्रीमान पोपटलाल’, असा उल्लेख करत राऊतांनी सोमय्यांना डिवचले; पण नेटक-यांकडून झाले ट्रोल )

काय म्हणाले किरीट सोमय्या ?

किरीट सोमय्या यांनी संजय राऊतांनादेखील सुनावले आहे. संजय राऊत यांनी दिलेल्या शिव्या सांगत त्यांनी राऊतांचा समाचार घेतला आहे. राऊतांची पीडा समजून घेतली पाहिजे. संजय राऊत यांनी केलेली शिवीगाळ त्यांची संस्कृती दाखवते. तशी संस्कृती आमची नाही. खालच्या पातळीचे लोक हे अशी खालच्या पातळीची भाषा वापरतात, असे म्हणत सोमय्या यांनी राऊतांना टोला लगावला.

सोमय्या पुढे म्हणाले की, उद्धव ठाकरे मला तोत-या म्हणतात पण महाराष्ट्राला या तोत-याचा अभिमान आहे. यावेळी थेट रश्मी ठाकरेंवर त्यांनी निशाणा साधला. एकोणवीस बंगले कुठे लपवले, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.