नुसते प्रेम दाखवू नका, सावरकरांना भारतरत्न द्या; राऊतांची सरकारकडे मागणी

115

सावरकरांबद्दल ढोंगी प्रेम दाखवू नका, त्यांना भारतरत्न द्या, ही शिवसेनेची मागणी असल्याचे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले. गेल्या 15 वर्षांपासून आम्ही ही मागणी करत आहोत. पण त्यांना भारतरत्न का दिला जात नाही? असा सवालही राऊतांनी सरकारला केला आहे.

( हेही वाचा: ‘महाज्योती’मध्ये मनमानी कारभार, विद्यार्थी हितासाठी संचालक तात्काळ बदला! )

सावरकर हिंदुह्रदयसम्राट होते, त्यांच्यानंतर बाळासाहेब हेच हिंदुह्रदयसम्राट असल्याचे राऊतांनी म्हटले. बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी तुम्हाला इतकेच प्रेम असेल तर त्यांनादेखील भारतरत्न द्यावा, असेही राऊत म्हणाले. या पदव्या दिल्यामुळे सावरकर किंवा बाळासाहेब मोठे होणार नाहीत, तर पदव्या मोठ्या होतील असेही राऊत म्हणाले.

त्याचे तेज कोणालाही हिरावून घेता येणार नाही 

बाळासाहेबांच्या विचारांची मशाल ही फक्त निष्ठावंतांच्याच हातात असू शकते. कारण बाळासाहेबांनी त्यांच्या संपूर्ण जीवनामध्ये निष्ठा आणि अस्मिता या शब्दाला महत्व प्राप्त करुन दिले आहे. त्याच तेज कोणालाही हिरावून घेता येणार नसल्याचे संजय राऊत म्हणाले.

शिंदे गटावर साधला निशाणा 

महाराष्ट्रामध्ये ढोंग चालणार नाही हे सतत बाळासाहेब ठाकरेंनी सांगितल्याचे संजय राऊत म्हणाले. त्यांनी ढोंग आमि खोटेपणा याचा त्यांनी कधीही पुरस्कार केला नाही. दुर्दैवाने या महाराष्ट्रात काही लोक आम्हीच बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार असल्याचे सांगत आहेत, ते ढोंगी आहेत, असे म्हणत राऊतांनी शिंदे गटावर टीका केली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.