विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन १७ ते २५ ऑगस्टपर्यंत

69

महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाची तारीख निश्चित झाली असून, १७ ते २५ ऑगस्ट या कालावधीत ते पार पडणार आहे. विधानसभा आणि विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीच्या गुरुवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

विधानभवनात सकाळी विधानसभा आणि विधानपरिषद विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठका झाल्या. या वेळी  विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, चंद्रकांत पाटील, दादा भुसे, उदय सामंत, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, विधानपरिषद व विधानसभा कामकाज सल्लागार समितीचे सदस्य, विधानमंडळ सचिवालय प्रधान सचिव राजेंद्र भागवत आदी उपस्थित होते.

( हेही वाचा: बच्चू कडूंच्या मंत्रीपदाबाबत केसरकरांचे मोठं विधान ; म्हणाले, ‘त्यांना लवकरच…’ )

दिनांक १७ ते २५ ऑगस्ट २०२२ या कालावधीत अधिवेशन होणार असून, यामध्ये शुक्रवार १९ ऑगस्टला दहीहंडीची सुट्टी, तसेच २० आणि २१ ऑगस्ट रोजी सार्वजनिक सुट्या आहेत. त्यामुळे या दिवशी अधिवेशनाचे कामकाज होणार नाही. २४ ऑगस्ट रोजी विधिमंडळ कामकाजात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. दरम्यान, या बैठकीत पावसाळी अधिवेशन विधानपरिषद व विधानसभा बैठकांची तात्पुरत्या दिनदर्शिकेवर चर्चा करण्यात आली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.