उद्धव ठाकरे यांचं आता फक्त MIM शी युती करणं बाकी; भाजपचा उद्धवसेनेवर निशाणा

100

मुंबईत सकल हिंदू समाजाने विराट मोर्चाचे आयोजन केले आहे. लव्ह जिहादला विरोध आणि धर्मांतर विरोधी कायदा लागू करण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला आहे. या मोर्चात शिंदे गट आणि भाजपचे नेतेही सहभागी झाले आहेत. मात्र, या मोर्चात ठाकरे गटाचा एकही नेताही हजर नाही. त्यावरुन भाजपने ठाकरे गटावर जोरदार हल्ला चढवला आहे. उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व कधीच सोडले आहे. त्यांनी फक्त आता एमआयएमशी युती करायचे तेवढे बाकी आहे, अशी टीका भाजप नेत्यांनी या मोर्च्याच्या माध्यमातून केली आहे.

( हेही वाचा: ‘भारतमातेच्या मुलांमध्ये फूट पाडण्यासाठी…’, पंतप्रधान मोदींचा सूचक इशारा कोणाला? )

उत्तर देण हाच पर्याय

महाराष्ट्रातील हिंदू जागा होत आहे. हिंदूने एकत्र येऊन संदेश देणे गरजेचे आहे. गेल्या तीन वर्षात हिंदूंवर अत्याचार होत आहे. हिंदूंना दाबण्याचा प्रयत्न झाला आहे. हिंदूंची संख्या कमी होईल याचा प्रयत्न झाला.

मुंबईतील हिंदूंना घरातून पलायन करावे लागले. या सर्व प्रकाराला एकच उत्तर आहे. ते म्हणजे हिंदूंनी जागे व्हावे. आमच्या विरोधात येणा-यांविरोधात आम्ही लढू शकतो हे सांगण्याची गरज आहे. त्यासाठी हा मोर्चा निघणे हा ऐतिहासिक क्षण आहे, असे आमदार नितेश राणे यांनी सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.