महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष आता घटनापीठाकडे; पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठापुढे होणार सुनावणी

92

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सर्वोच्च सुनावणीत एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्राचा सत्तासंघर्ष घटनापीठाकडे सोपवण्यात  आला आहे. अनेक घटनात्मक बाबींचा समावेश या प्रकरणात असल्याने, हे प्रकरणा आता घटनापीठाकडे सुपूर्द करण्यात आले आहे. या प्रकरणातील पुढील सुनावणी आता गुरुवारी होणार आहे. निवडणूक आयोगासमोर प्रलंबित असणा-या मुद्द्यांबाबत सर्वोच्च न्यायालय महत्त्वाचे निर्देश यावेळी देण्याची शक्यता आहे.

या मुद्द्यांवर घटनापीठ निर्णय घेणार ?

  • विधानसभा अध्यक्षांविरोधात अविश्वास ठराव प्रलंबित असताना, आमदारांच्या अपात्रतेवर सुनावणी करु शकतात का?
  • या दरम्यान सभागृहाचे कामकाज कसे सुरु राहिल?
  • राजकीय पक्षातील अंतर्गत लोकशाही आणि त्यात निवडणूक आयोगाची भूमिका या मुद्द्यांवर घटनापीठ सुनावणी करणार आहे.

घटनापीठापुढे होणार सुनावणी

शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे हे 40 आमदारांना घेऊन शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर, राज्यात मोठा सत्तासंघर्ष पहायला मिळाला. अगोदर गुजरात, आसाम आणि शेवटी गोवा अशा ठिकाणी नाराज आमदार मुक्कामाला राहिले. त्यानंतर भाजप आणि एकनाथ शिंदे गटाने सत्ता स्थापन केली. मात्र, यादरम्यान अनेक घडामोडींना वेग आला आणि शिवसेनेने 16 नाराज आमदारांवर कारवाई केली. त्यानंतर हे प्रकरण थेट सर्वोच्च न्यायालयात गेले. त्यावर मंगळवारी 23 ऑगस्टला सुनावणी होती. या सुनावणी दरम्यान न्यायमूर्तींनी हे प्रकरण घटनापीठाकडे सोपवले आहे.

( हेही वाचा: मातोश्री भ्रष्टाचाराच्या पैशांनी भरलीय; भातखळकरांची उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.