गांधींच्या एका चुकीमुळे देशाचे दोन तुकडे झाले, संघाचे नेते इंद्रेश कुमार यांचे विधान

92

भारत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे. याच पार्श्वभूमीवर आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते इंद्रेश कुमार यांनी देशाच्या फाळणीबाबत मोठे विधान केले आहे. 75 वर्षांपूर्वी भारताची फाळणी झाली आणि भारत स्वतंत्र झाला. पण त्यावेळी इंग्रजांशी चर्चा करण्यासाठी गांधींनी जवाहरलाल नेहरू आणि मोहम्मद अली जिना यांची एडीसी म्हणून नेमणूक केली नसती तर भारताचे तुकडे होऊन देश विभागला गेला नसता, असे विधान इंद्रेश कुमार यांनी केले आहे.

गांधींच्या चुकीमुळे फाळणी

त्यावेळी देशाची फाळणी ही नक्कीच टाळता आली असती. जर गांधींनी नेहरू आणि जिनांच्या ऐवजी सरदार पटेल,सुभाषचंद्र बोस किंवा महर्षी अरविंद यांची एडीसी म्हणून निवड केली असती तर अखंड भारताला स्वातंत्र्य मिळाले असते. गांधींच्या एका चुकीमुळे देशाची फाळणी झाली, असे कुमार यांनी म्हटले आहे. राजस्थानात झालेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते.

(हेही वाचाः राज्यातील 11 पोलिसांना केंद्रीय गृहमंत्री पदक जाहीर)

काँग्रेसवर साधला निशाणा

तसेच इंद्रेश कुमार यांनी काँग्रेस खासदार ्धीर रंजन चौधरी यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. चौधरी यांनी भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा राष्ट्रपत्नी असा उल्लेख करुन अपमान केला आहे. त्यांना देशातील सर्वोच्च पदाचा अपमान करतानाही काही वाटत नाही, असे म्हणत इंद्रेश कुमार यांनी काँग्रेसवर टीका केली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.