मातोश्री भ्रष्टाचाराच्या पैशांनी भरलीय; भातखळकरांची उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका

109

भाजप नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. यावेळी भातखळकर यांनी टीका करताना, उद्धव ठाकरे यांनी भ्रष्टाचाराच्या पैशांनी मातोश्री भरल्याचे सांगितले. त्यांचा घडा आता भरला आहे आणि तो लवकरच भाजप फोडणार असल्याचे, म्हटले आहे.

अतुल भातखळकर पुढे म्हणाले की, मागच्या वेळी भाजप त्यांच्याविरोधात लढली त्याचवेळी त्यांच्या नाका तोंडात पाणी गेले होते. त्यावेळी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महनगरपालिकेतील शिवसेनेचा महापौर बसू दिला. मात्र यावेळी 110 टक्के आम्ही मुंबई महानगरपालिका जिंकणार. आता जनता उद्धव ठाकरे यांना उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही, हे लक्षात ठेवावे, असे भातखळकर म्हणाले.

( हेही वाचा: शिवसेनेचे माजी आमदार अशोक पाटील शिंदे गटात सामिल; शिवसेनेत अपमान झाल्याचा केला आरोप )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.