“कुणी पावसात कितीही भिजलं तरी काहीही उपयोग होणार नाही; मविआ हरणारच”

84

विधान परिषदेची निवडणूक सुरु आहे. दोन्ही बाजूने जिंकण्याचा दावा केला जात आहे. त्यातच आता आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना टोला लगावला आहे. पडळकर म्हणाले की, काहीही झाले तरी महाविकास आघाडी विधान परिषद निवडणूक जिंकणार नाही. पावसात कुणी कितीही भिजा काहीही उपयोग होणार नाही, असे पडळकर म्हणाले.

विजय भाजपचाच होणार 

सातारा लोकसभा पोटनिवडणुकीवेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सभेच्यावेळी पाऊस पडला आणि ती निवडणूक राष्ट्रवादीने जिंकली. उदयनराजे भोसले यांचा पराभव झाला तर पवारांचे स्नेही श्रीनिवास पाटील यांनी हा विजय खेचून आणला. सध्या पावसाळा सुरु आहे. मुंबईत धोधो पाऊस कोसळत आहे. विधान परिषदेची निवडणूक होत आहे. पण आता कोणीही पावसात भिजले तरी विजय भाजपचाच होणार, असा दावा गोपीचंद पडळकर यांनी केला आहे.

( हेही वाचा: भाजपची रणनीती! अजित पवारांच्या भेटीला बावनकुळे; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.