‘नाहीतर माझा पक्ष आंदोलन सुरू करेल…’ राज ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

असं दिसतंय की महाराष्ट्र सरकारला अजूनही टाळेबंदी आणि निर्बंधांच्या पलीकडे काही सूचत नाही.

78

राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर सर्वसामान्य मुंबईकरांसाठी लोकल बंद करण्यात आली असून, यामुळे मुंबईकरांचे हाल होत आहेत. याचमुळे आता खुद्द मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकल सुरू करण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. मुंबईमध्ये लोकल प्रवास सर्वांसाठी त्वरित खुला अन्यथा मनसेतर्फे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा राज ठाकरेंनी या पत्रातून दिला आहे.

नेमकं काय साध्य होणार?

गेल्या १५ महिन्यांपासून देशाप्रमाणे महाराष्ट्रात अनेक प्रकारचे निर्बंध महाराष्ट्र सरकारने लागू केले आहेत. हे निर्बंध आपण सर्वच जण पाळत आलो आहोत. पण आजकाल हे निर्बंध नक्की कोणासाठी असा प्रश्न पडू लागला आहे. त्यातल्या त्यात सध्या मुंबई शहरासाठी जे निर्णय घेतले जात आहेत ते तर अनाकलनीय आहेत. मुंबईतील जवळजवळ सर्व कार्यालये सुरू आहेत. सर्वांना घरुन काम करता येणं शक्य नाही. यासाठी त्यांना रोज अनेक तास प्रवास करावा लागतो. त्यात लोकल सेवा बंद असल्यामुळे मुंबईकरांचे अतोनात हाल होत आहेत. महाराष्ट्र सरकारनं बस सेवेला परवानगी दिली, पण लोकल बंद असल्याने या बसमध्ये प्रचंड गर्दी होत असते. अशा गर्दीत प्रवास केल्यानं कोरोना अधिक पसरण्याचाच धोका आहे. त्यामुळे बस सुरू आणि लोकल बंद ह्यानं नेमकं काय साध्य होणार?, असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.

(हेही वाचाः यंदा मनसे निर्बंधांची हंडी फोडणार!)

सरकारला काही सूचत नाही

ही साथ एकाएकी जाणार नाही असं जगातल्या तज्ज्ञांचं मत आहे. त्यामुळे यापुढे आपल्याला अशा साथीबरोबरच राहण्याची सवय करुन घेण्याची गरज आहे आणि त्याला धरूनच योग्य निर्णय, उपाययोजना आपल्याला करायला हव्यात. लसीकरणाचा वेग वाढवणं गरजेचं आहेच, परंतु त्यासोबतच धोरण आखणीमध्ये अधिक कल्पकता दाखवायला हवी. पण  असं दिसतंय की महाराष्ट्र सरकारला अजूनही टाळेबंदी आणि निर्बंधांच्या पलीकडे काही सूचत नाही.

WhatsApp Image 2021 07 22 at 1.00.52 PM

माझा पक्ष मुंबईकरांसोबत

महाराष्ट्र सरकारनं निर्बंध शिथिल करण्यासाठी आणि मुख्य म्हणजे मुंबईची लोकल सेवा सुरू करण्यासाठी आता तातडीनं पावले उचलावीत. सर्वसामान्य माणसानं आत्तापर्यंत खूप सहन केलं आणि त्याची सहन करण्याची क्षमता आता संपत चालली. त्यामुळे आता यापुढे सरकारकडून काही सकारात्मक उपाय केले गेले नाहीत, तर कडेलोट होईल. त्या परिस्थितीत माझा पक्ष मुंबईकरांसोबत तर उभा राहीलच, पण लोकल प्रवास तातडीनं सुरू करण्यासाठी आंदोलन सुरू करेल.

WhatsApp Image 2021 07 22 at 1.00.53 PM

(हेही वाचाः …म्हणून राज ठाकरेंनी मास्क लावला!)

सरकारने पावले उचलावीत

त्यामुळे मी माझ्या पक्षातर्फे मुख्यमंत्र्यांना अशी मागणी करतो आहे की मुंबईकरांचे रोजचे हाल थांबवण्यासाठी मुंबईची लोकल सेवा निदान ज्यांनी लसीचे दोन डोस घेतले आहेत अशा सर्वांसाठी तरी अत्यंत तातडीनं सुरू केले जावे. विविध प्रकारच्या मोहिमा हातात घेऊन लसीकरण वाढवावे म्हणजे अधिकाधिक लोक लोकल प्रवासाचा लाभ घेऊ शकतील आणि मुंबईचं अर्थचक्र पुन्हा सुरळीत सुरू होईल. मला अपेक्षा आहे की महाराष्ट्र सरकार ह्या सगळ्याचा विचार करुन त्वरित पावलं उचलेल, असे ते शेवटी म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.