शिंदेंचे बंड झाले नसते तर, यात्रा काढली असती का? अमित ठाकरेंची आदित्य ठाकरेंवर टीका

97

सध्या राज्याच्या राजकारणात बरेच बदल होत आहेत. शिंदेंच्या बंडामुळे शिवसेनेत मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यानंतर आदित्य ठाकरे अधिक आक्रमक झाल्याचे दिसत आहेत. ते अधिक ठामपणे शिवसेनेची बाजू मांडताना दिसत आहेत. आदित्य ठाकरे सध्या महाराष्ट्राचा दौरा करत आहेत. पक्षातील नेत्यांशी, सर्वसामान्य लोकांशी बोलून त्यांच्या समस्या जाणून घेत आहेत. अशातच त्यांचे बंधू आणि मनसे नेते अमित ठाकरे यांनी त्यांच्या या दौ-यावर टीका केली आहे. अमित ठाकरे यांनी आदित्य ठाकरेंच्या रॅलीवर आपली प्रतिक्रिया दिली. शिवसेनेत बंड होण्याआधी मी माझे दौरे सुरु केले आहेत. पण माझा आदित्य ठाकरेंना प्रश्न आहे. जर एकनाथ शिंदे यांचे बंड झाले नसते, तर तुम्ही दौरा केला असता का? एवढाच माझा एक प्रश्न आहे, असे अमित ठाकरे म्हणाले आहेत.

तेजसचे स्वागत

तेजस ठाकरे सध्या राजकारणात सक्रिय होताना दिसत आहेत, त्यामुळे ठाकरे घराण्यातील तेजस ठाकरे राजकारणात येणार अशा चर्चा आहेत. त्यावर अमित ठाकरेंची भाष्य केले आहे. तेजस राजकारणात येत असतील तर त्यांचे स्वागत आहे, असे अमित ठाकरे म्हणाले आहेत.

( हेही वाचा: मढ मार्वे स्टुडिओ घोटाळ्याप्रकरणी अस्लम शेख यांना पर्यावरण खात्याची नोटीस )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.