“साहेब जैसा बोले तैसा चाले,म्हणून यांचे अस्तित्व बुडाले”; उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर मनसेची टीका

88

एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर, तसेच राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना ला पहिली मुलाखत दिली. सामनाचे संपादक संजय राऊत यांनी ही मुलाखत घेतली. 26 आणि 27 जुलैला ही मुलाखत प्रर्दशित होणार आहे. आता याच मुलाखतीवर मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी टीका केली आहे. एक व्यंगचित्र शेअर करत, त्यांनी मुलाखतीवर भाष्य केले आहे. “साहेब जैसा जैसा बोले, हा तैसा तैसा चाले म्हणून यांचे अस्तित्व बुडाले”, असे ट्वीट त्यांनी केले आहे.

व्यंगचित्र शेअर करत टीका

संदीप देशपांडे यांनी एक व्यंगचित्र शेअर केलं आहे. यात मुलाखतीसाठीचा स्टुडिओ दिसत आहे. मुलाखतीला सुरुवात करण्याआधी संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंमधील संवाद दाखवण्यात आला आहे. हे घ्या साहेबांनी पाठवलेले मुलाखतीसाठीचे प्रश्न आणि उत्तर, असं संजय राऊत म्हणतात. त्यावर बघा आता कशी देतो खणखणीत उत्तरं, असं उद्धव ठाकरे म्हणतात. तसेच, या संभाषणादरम्यान, संजय राऊत यांच्या हातात घड्याळ दाखवण्यात आले आहे, असे ट्वीट देशपांडे यांनी केले आहे.

( हेही वाचा: नव्या संसद भवनात बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा लावण्यासाठी पंतप्रधानांना विनंती करणार – एकनाथ शिंदे )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.