प्रभादेवीतील राड्यावर ‘मनसे’ची प्रतिक्रिया, म्हणाले “शिवसेनेने अडीच वर्षात जे…”

97

मुंबईतील प्रभादेवी परिसरात गणेश विसर्जनादरम्यान, शिंदे गट आणि शिवसेनेत झालेल्या वादानंतर शनिवारी मध्यरात्री मोठा राडा झाला. यावेळी दादर पोलीस स्टेशन परिसरात दोन्ही गट समोरासमोर भिडल्याचे दिसून आले. दरम्यान, मध्यरात्री झालेल्या उद्धव गट-शिंदे गटातील राड्याप्रकरणी दादर पोलिसांनी 25 शिवसैनिकांवर गुन्हे दाखल केले आहेत. यासर्व प्रकरणावर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी भाष्य केले असून आपली प्रतिक्रिया दिली आहे. या घटनेबाबत संताप व्यक्त करत हा महाराष्ट्र आहे हाणामाऱ्या करायला हे काय बिहार राज्य आहे का, असा सवाल उपस्थित केला आहे.

(हेही वाचा – प्रभादेवीतील उद्धव गट विरूद्ध शिंदे गटातील राडा प्रकरणी २५ शिवसैनिकांवर गुन्हा दाखल)

काय म्हणाले संदीप देशपांडे?

दादर, प्रभादेवी, माहीम हे सुसंस्कृत मतदासंघ आहेत. अशा प्रकारच्या हाणामाऱ्या करायला हे काय बिहार राज्य नाही. या प्रकरणाचा पोलिसांनी तपास करावा आणि जे दोषी आहेत त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी संदीप देशपांडे यांनी केली आहे. तसेच पुढे बोलताना त्यांनी शिवसेनेवर देखील निशाणा साधल्याचे दिसून आले. शिवसेनेने जे अडीच वर्षांत पेरलं आता तेच उगवत असल्याचे संदीप देशपांडे यांनी म्हटले आहे. मनसे आंदोलनाच्यावेळी माझ्यावरही एका पोलीस भगिनीला धक्का मारल्याचा खोटा आरोप करून माझ्यावर खोटी केस दाखल करण्यात आल्याचीही त्यांनी आठवण करून दिली.

संदीप देशपांडे यांनी शिवसेनेला टोला लगावत असे म्हटले की, तुम्ही लोकांवर खोट्या केस टाकल्या त्यांना अडकवण्याचा प्रयत्न केला. माझ्यावरही खोटी केस झाली. शिवसेनेने अडीच वर्षात जे पेरलं तेच आता उगवत आहे. या प्रकरणात आतापर्यंत 25 शिवसैनिकांवर दादर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता या प्रकरणावरून पुन्हा एकदा राजकारण तापणाक असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.