नादाला लागाल तर पळून जाल; MNS चा उबाठा गटाला इशारा

चौथ्या टप्प्याच्या मतदानाच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी छत्रपती संभाजीनगरमध्ये मनसैनिक आणि उबाठा गटात राडा झाला. महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये बाचाबाची झाली.

237
नादाला लागाल तर पळून जाल; MNS चा उबाठा गटाला इशारा

आमच्या नादाला लागाल तर पार्श्वभागाला पाय लावून पळून जाल, असा इशारा मनसे (MNS) नेते संदीप देशपांडे यांनी ठाकरे गटाला दिला. (MNS)

मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या महायुतीचा प्रचार करत असल्याने शिवसेना ठाकरे गट आणि मनसेमध्ये आज शनिवारी पाहिली ठिणगी पडली. चौथ्या टप्प्याच्या मतदानाच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी छत्रपती संभाजीनगरमध्ये मनसैनिक आणि उबाठा गटात राडा झाला. महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये बाचाबाची झाली. क्रांती चौकातून चंद्रकांत खैरे यांची रॅली निघणार होती. त्याचवेळी महायुतीचे कार्यकर्ते त्याठिकाणी पोहोचले आणि गोंधळाची स्थिती निर्माण झाली. यावरून दोन्ही बाजूंनी घोषणाबाजी शिवीगाळ झाली. यावे मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. (MNS)

(हेही वाचा – राऊत, ठाकरे अज्ञातवासात जातील; Chandrashekhar Bawankule यांची टीका)

आमच्या मनसैनिकांच्या नादाला कोणी लागू नये. नाही तर यांच्या पार्श्वभागाला पाय लावून पळायला लावू. यांनी हात तोडण्याची भाषा करू नये. यांना तर आज आम्ही पळवून पळवून मारले आहे. चंद्रकांत खैरे हे आऊटडेटेड नेते आहेत. सिम कार्ड नसलेला जुना मोबाईल आहे. हा काय आम्हाला धमकी देणार?,असे म्हणत संदीप देशपांडे यांनी इशारा दिला आहे. (MNS)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.