‘बायकोच्या हस्तक्षेपामुळे उद्धव ठाकरेंचे मुख्यमंत्रीपद गेले’ मनसेच्या प्रकाश महाजनांचे टीकास्त्र

146

मनसे नेते प्रकाश महाजन यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटावर सडकून टीका केली आहे. यावेळी प्रकाश महाजनांनी उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. रश्मी ठाकरेंनी सरकारच्या कारभारात हस्तक्षेप केल्यामुळेच उद्धव ठाकरेंचे मुख्यमंत्रीपद केले असा आरोप महाजन यांनी केला आहे. मनसेने आयोजित केलेल्या घे भरारी सभेत ते बोलत होते.

( हेही वाचा : आगामी निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढवेल; शरद पवारांची माहिती)

प्रकाश महाजनांचे गंभीर आरोप 

आपण नेहमी म्हणतो राजहट्ट, बालहट्ट, स्त्रीहट्ट. एक स्त्रीहट्टामुळे महाविकास आघाडी तयार झाली. ही आघाडी तयार करणाऱ्यांमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणातील नारद शरद पवार, संजय राऊत यांचा समावेश होता. सत्तेशिवाय यांना करमत नाही. त्यामुळे या जोडगोळीने मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरेंना पटवण्याचे काम केले. सैरेंद्रीला नवरा मुख्यमंत्री होतो की नाही यात रस नव्हता फक्त मुलाला मुख्यमंत्री करायचे होते त्यामुळे उद्धव ठाकरेंना आजारी पाडण्यात आलं असा गंभीर आरोप प्रकाश महाजनांनी केला आहे.

महाभारतात धर्मराजा सर्वकाही हरला. इथे मात्र कारभार सुरू झाला आणि बायकोने इतका हस्तक्षेप केला की, नवऱ्याचे राज्य पणाला लागले आणि मुख्यमंत्रीपद गेले अशी खोचक टीका प्रकाश महाजनांनी केली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.