वाढत्या महागाईदरम्यान सर्वसामान्यांना दिलासा! मोदी सरकारचा ‘हा’ मोठा निर्णय

93

वाढत्या महागाईदरम्यान सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी मोदी सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. इंधन, घरगुती गॅस सिलिंडरनंतर आता खाद्यतेलही स्वस्त होणार असल्याचे संकेत केंद्र सरकारकडून देण्यात आले आहे. दरम्यान सरकारने खाद्यतेलावरील आयात शुल्कात सूट दिली आहे.

दोन वर्षे किंमती वाढण्यापासून दिलासा

मिळालेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारने सूर्यफुलासह सोयाबीनच्या आयातीवरील सीमाशुल्क हटविल्याने देशातील खाद्यतेलाच्या किंमती अटोक्यात येणार आहे. इंधनावर आकारण्यात येणाऱ्या रस्ते आणि पायाभूत सुविधांच्या उपकरात पेट्रोलमध्ये ८ रूपये आणि डिझेलमध्ये ६ रूपयांची कपात करण्यात आली आहे. त्यानंतर आता खाद्यतेल स्वस्त होणार आहे. सरकारने दरवर्षी २० लाख टन कच्च्या सोयाबीन आणि सूर्यफुल तेलाच्या आयातीवर सीमा शुल्क आणि कृषी उपकरांना ३१ मार्च २०२४ पर्यंत पायबंद घातला आहे. त्यामुळे साधारण दोन वर्षे तरी तेलाच्या किंमती वाढणार नसल्याचे सांगितले जात आहे.

(हेही वाचा – “विकासाच्या नावाखाली जनतेची फसवणूक करणं पवारांची जुनी परंपरा”)

किरकोळ बाजारातील ग्राहकांना दिलासा

देशांतर्गत बाजारात खाद्यपदार्थ्यांच्या वाढत्या किंमतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. सरकारने सूर्यफुल आणि सोयाबीन तेलाच्या किमती कमी करण्यासाठी या दोन्ही तेलाच्या आयातीवरील आयात शुल्क दोन वर्षांसाठी पूर्णपणे रद्द केले आहे. यासह कृषी विकास म्हणून आकारण्यात येणारा ५ टक्के सेस काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे खाद्यतेलाच्या किमती कमी होणार असून त्याचा परिणाम थेट किरकोळ बाजारातील ग्राहकांना होणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.