‘हा शनी महाराष्ट्रातून लवकर दूर व्हावा यासाठी…’, नवनीत राणांचा ठाकरे सरकारवर निशाणा

100

खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी मातोश्रीसमोर हनुमान चालिसा पठण करण्याचा इशारा दिल्यानंतर राज्यातील वातावरण चांगलेच तापले होते. त्यानंतर राणा दाम्पत्याला अटक देखील करण्यात आली. जामिनावर सुटका झाल्यानंतर आता राणा दाम्पत्याने पुन्हा एकदा ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. हा शनी महाराष्ट्रातून दूर करण्यासाठी आपण रोज हनुमान चालिसा पठण करणार असल्याचे नवनीत राणा यांनी म्हटले आहे.

(हेही वाचाः मुख्यमंत्र्यांनी माझ्याप्रमाणेच संभाजीराजेंचा फोन उचलला नाही- फडणवीस)

उद्धव ठाकरेंना दुसरं काम नाही

राणा दाम्पत्य शनिवारी नागपूरमध्ये दाखल झाले. त्यावेळी माध्यमांशी बोलताना नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्ला चढवला आहे. आम्ही नागपूरमध्ये मंदिरात दर्शन करण्यासाठी जात आहोत. तर आम्हाला आमतमध्ये थांबवून ठेवण्यात आलं. महाराष्ट्रात देवाला एवढा विरोध का आहे?, उद्धव ठाकरेंना दुसरं कुठलंही काम राहिलेलं नाही का?, असे सवाल नवनीत राणा यांनी केले आहेत. हा शनी महाराष्ट्रातून दूर झाला पाहिजे यासाठी मी दररोज हनुमान चालिसा व आरती करेन, असे म्हणत राणा यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.

देखाव्यासाठी तरी मुख्यमंत्र्यांनी…

राणा दाम्पत्य केवळ देखाव्यासाठी हनुमान चालिसा पठणाचा कार्यक्रम त्यांच्यावर करण्यात येत आहे. यावरुनही आता राणा यांनी टीकाकारांना चोख उत्तर दिले आहे. आम्ही निदान देखाव्यासाठी तरी करतो, मुख्यमंत्री देखाव्यासाठीही हनुमान चालिसा म्हणत नाहीत. एकदा देखाव्यासाठी का होईना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हनुमान चालिसा वाचावी, असेही नवनीत राणा यांनी म्हटले आहे.

(हेही वाचाः नवनीत राणा प्रकरणः राज्याचे मुख्य सचिव आणि मुंबई पोलिस महासंचालकांना दिल्लीत बोलावले)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.