ठरले! अखेर ‘हे’ करणार परमवीर सिंगांच्या आरोपांची चौकशी! 

गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर खंडणी खोरीचा गंभीर आरोप झाल्याने ते अडचणीत सापडले आहेत. त्यांची उच्च स्तरीय चौकशी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. 

104

मुंबई पोलीस आयुक्त पदावरून हटवल्यावर नाराज झालेले पोलीस महासंचालक परमवीर सिंग यांनी लेटरबॉम्ब टाकला आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांचीच खुर्ची अडचणीत आली. अंबानी प्रकरण आणि मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण यामध्ये अटकेत असलेला पोलीस अधिकारी सचिन वाझे याला देशमुख ‘दर महिन्याला १०० कोटी रुपये जमा करून आण’, असे सांगत असल्याचे या पत्रात म्हटल्याने देशमुखांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी केली. अखेर सरकारने या आरोपांची चौकशी करण्याचा निर्णय घेत मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती कैलास उत्तमचंद चांदीवाल यांच्या अध्यक्षतेखाली एक सदस्यीय चौकशी समिती स्थापन केली आहे.

कोणत्या मुद्यावर समिती करणार चौकशी? 

  • परमवीर सिंग यांच्या पत्रात आरोप केल्याप्रमाणे गृहमंत्री यांच्याकडून किंवा त्यांच्या कार्यालयातील कोणत्याही अधिकाऱ्याकडून कोणतेही गैरवर्तवणूक/गुन्हा घडल्याचे निष्पन्न होईल, असा काही पुरावा परमवीर सिंग यांनी त्यांच्या पत्रात सादर केला आहे का किंवा कसे?
  • सहाय्यक पोलीस आयुक्त संजय पाटील, साहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांच्याकडून प्राप्त तथाकथित माहितीच्या आधारे परमवीर सिंग यांची पोलीस आयुक्त, मुंबई या पदावरून बदली झाल्यावर त्यांनी २० मार्च २०२१ रोजी या पत्रात  केलेल्या आरोपावरून गृहमंत्री किंवा त्यांच्या कार्यालयातील कर्मचारी यांच्याकडून असा काही गुन्हा केल्याचे निष्पन्न होईल किंवा कसे यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग किंवा अन्य तपास यंत्रणेमार्फत तपासाची गरज आहे?
  • प्राप्त विषयाशी संबंधित अन्य उपयुक्त शिफारशी करणे.
  • ६ महिन्यांत या उच्च स्तरीय समितीने चौकशी अहवाल सादर करणे.

(हेही वाचा : मुंबईतील दैनंदिन रुग्ण संख्या १० हजारांवर होणार! महापालिका आयुक्तांचा अंदाज)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.