नवाब मलिक आणि अनिल देशमुखांच्या मतदानाच्या आशा मावळल्या

90

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनिल देशमुख आणि नवाब मलिक या दोघांच्याही राज्यसभेच्या मतदानाची आशा मावळल्याचे समोर आले आहे. नवाब मलिक यांच्या सुधारीत अर्जावर तातडीने सुनावणी द्यायला मुंबई सत्र न्यायालयाने नकार दिला आहे. न्यायमुर्ती भारती डांगरे यांनी मलिकांच्या अर्जावर तातडीने सुनावणीस नकार दिला आहे.

(हेही वाचा- आदित्य ठाकरेंच्या मतपत्रिकेमध्ये झाली गडबड, नंतर झालं काय?)

मुंबई सत्र न्यायालयाने नवाब मलिकांच्या सुधारीत अर्जावर तातडीने सुनावणीस नकार दिल्याने महाविकास आघाडीला मोठा धक्का बसल्याचे सांगितले जात आहे. सकाळी नवाब मलिकांनी जो अर्ज दाखल केला होता, त्यातील जामिनाचा मुद्दा वगळता पुन्हा एकदा याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र यावर न्यायालयाने तातडीने सुनावणी देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत राज्यसभेच्या मतदान प्रक्रियेत नवाब मलिक आणि अनिल देशमुखाना मतदान करता येणार नसल्याने राष्ट्रवादीची दोन मतं वाया जाणार असल्याचे सांगितले जात आहे.

देशमुखांना मतदानाचा हक्क बजावता येणार नाही

१२ वाजेपर्यंत १७० आमदारांनी मतदान केलं आहे. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विधानभवनात दाखल झाले आहेत. तर काँग्रेसच्या ४४ आमदारांचे मतदान पूर्ण झाले आहे. अशातच हे मतदान सुरू असतानाच महाविकास आघाडीला मोठा झटका बसला आहे. अनिल देशमुखांची यांची सुनावणी घेण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. त्यामुळे अनिल देशमुख यांना राज्यसभेत मतदानाचा हक्क बजावता येणार नाही. तर नवाब मलिक यांच्या अर्जावर सुनावणी सुरू होती. यामध्ये देखील मलिकांना मुंबई उच्च न्यायालयाकडून झटका मिळाल्याचे पाहायला मिळाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.