मुख्यमंत्री असताना लोकांच्या घरांना ‘मशाल’ लावली – नारायण राणेंची टीका

156

निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे यांना मशाल चिन्ह दिल्यानंतर, शिवसेनेने हे नवीन चिन्ह क्रांती घडवेल, असा दावा केला आहे. त्यावर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सडकून टीका केली. क्रांती घडवायची होती तर मुख्यमंत्री असताना क्रांती का घडवली नाही, तेव्हा लोकांच्या घरांना मशाल लावली, असे राणे म्हणाले.

लोकांची घरे उद्धवस्त करू नका 

उद्धव ठाकरे यांच्या गटाला निवडणूक आयोगाने ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ हे नाव आणि मशाल हे निवडणूक चिन्ह दिले आहे. त्यावर बोलताना नारायण राणे म्हणाले की, नावात उद्धव आहे. पण उद्ध्वस्त करायला मशाल लावू नये, असे सांगत तुम्हाला तर क्रांती घडवायची होती तर सत्तेत असताना आणि मुख्यमंत्री असताना क्रांती घडवली नाही. लोकांचे घर उद्ध्वस्त करायला मशाल लावली. आता राज्यात एवढा उजेड पडला आहे की, मशालची गरजच पडणार नाही. याआधीही धनुष्यबाण काही उजेड पाडू शकला नाही, मग मशाल काय उजेड पाडणार, अशी खोचक टीका नारायण राणे यांनी केली.

(हेही वाचा घाबरू नका..! सत्तेच्या खुर्चीवर मी बसणार नाही, तुम्हालाच बसवेन; राज ठाकरेंची कोपरखळी)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.