वीर सावरकरांचा अवमान करणाऱ्या राहुल गांधींची गळाभेट घेतली, हिंदुत्व शब्दही उच्चारू नका!

83

भारत जोडो यात्रेत असताना राहुल गांधी यांनी थेट वीर सावरकर यांचा अवमान केला होता. त्या भारत जोडो यात्रेत सहभागी होऊन आदित्य ठाकरे यांनी राहुल गांधी यांना मिठी देखील मारली. याचा भाजपचे नेते, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत खरपूस समाचार घेतला. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व आणि सावरकर हे शब्दही उच्चारू नये आणि ते शब्द जिभेवरही आणू नये अशी जोरदार टीका केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली.

काय म्हणाले नारायण राणे? 

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मंगळवारी, २९ नोव्हेंबर रोजी मुंबईत पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरेंच्या बुलढाण्यातील भाषणाचा समाचार घेतला. तसेच आदित्य ठाकरेंवरही शेलक्या शब्दात टीका केला. उद्धव ठाकरेंनी बुलढाण्यातील सभेत अगदीच मूळमूळीत भाषण केले. वीर सावरकरांबाबत उद्धव ठाकरे का बोलले नाहीत. ज्या राहुल गांधींनी सावरकरांचा अपमान केला त्याच्याशी आदित्य ठाकरे जाऊन गळाभेट घेतात. आदित्य ठाकरे तर पिल्लू आहे. मला तर वाटते राहुलला मिठी मारल्यावर आदित्य ठाकरे त्यांच्या कानात वेल डन म्हणाले असतील. सावरकरांबाबत जे विधान केले त्याबाबत आदित्य ठाकरेंनी राहुल यांचे कौतुक केले असेल, असेही राणे म्हणाले. उद्योग धंदे राज्याबाहेर गेल्याचे बोलले जात आहे. पण उद्धव ठाकरेंच्या अडीच वर्षाच्या काळात जे उद्योग गेले त्याबाबत कुणीही काही बोलत नाही. ज्या कंपन्या बाहेर गेल्या त्या कंपन्यांशी दीडवर्ष उद्धव ठाकरेच बोलत होते. मुख्यमंत्री म्हणून अडीच वर्षात फक्त अडीच तासच खूर्चीवर बसले, असेही नारायण राणे म्हणाले.

(हेही वाचा राष्ट्रवादीत फूट; देवी सरस्वतीचा अवमान करणाऱ्या भुजबळांना रोहित पवारांनी सुनावले)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.