मोदी, शाह, फडणवीसांवर टीका करता याला माफी नाही भरपाई होणार; नारायण राणेंचा इशारा

बाळासाहेब तुला सुरक्षित करून गेले, तू आदित्य सुरक्षित केले नाही त्याला कारण तू आहेत, दुश्मन वाढवत आहे, असे राणे उद्धव ठाकरे यांना म्हणाले. .

110

देवेंद्र फडणवीस यांना फडतूस म्हणाले. या शब्दाचा अर्थ तरी कळतो का, भाजपने जर २०१४ साली उद्धवला मदत केली नसती तरी कुणीच निवडून आले नसते, २०१९ मध्ये मी फडणवीस यांना म्हणालो होतो त्यांना मदत करू नका, पण तरी केली आणि नंतर काय केले. उद्धव ठाकरे सुपारी देऊनही मला मारू शकले नाही. एकही भाई सोडला नाही, सगळे भाई मलाच फोन करून सांगायचे, कुणाला सोडले नाही. सगळ्यात खोटारडा माणूस, महा फडतूस माणूस आहे. तो ना राज्याला आणि देशाच्या कामाला आला नाही आता कुटुंबाच्या तरी मदतीला येणार आहे का? देवेंद्र यांच्यातील कोणते गुण उद्धव ठाकरे यांच्यात आहेत. या राज्याला अधोगतीला नेण्याचे काम त्यांनी केले. मोदी, शाह, फडणवीसांवर टीका करता याला माफी नाही; असा इशारा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत दिला.

फडतूस काय असेल याचे प्रात्यक्षित दिसेल

राष्ट्रवादीवाले उद्धवला बोलावतात, त्यांना चांगले वाटते आणि तेच डोळे मारतात. आव्हान देण्याचे काम करू नका. पंतप्रधान मोदी यांनी जगाच्या पाठीवर नाव लौकिक मिळवला आहे. भारताची अर्थव्यवस्था ५व्या क्रमांकावर आली आहे. आता तिसऱ्या क्रमांकावर जाणार आहे. एक तरी उद्धव ठाकरे यांनी केलेले काम सांगावे. सगळे करूनही सगळे गप्प आहेत, कारण बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे. अशी भाषा परत बोलला तर त्याचे परिणाम वाईट होईल फडतूस कसा असेल याचे प्रात्यक्षिक पाहायला मिळेल. इतके जण कोरोनात मेले त्यांच्या कुटुंबाला काही दिले नाही. काही झाले तर पत्नी आणि मुलाला घेतो आणि रडायला लागतो. त्यांनी तोंड बंद करावे, त्यांना राज्यात भवितव्य नाही. मुख्यमंत्री असताना मुंबईच्या आयुक्ताला रोज वर्षावर बोलावले जायचे आणि नारायण राणे यांचे घर कधी तोडणार असे विचारायचे, असे करता करता मुख्यमंत्री पद गेले, पण माझे घर आहे तिथेच आहे. एक नंबर, २ नंबर मातोश्री किती बेकायदेशीर आहे माहित आहे का, सध्याचे सरकार याची चौकशी करेल, असेही नारायण राणे म्हणाले.

(हेही वाचा सततचा पाऊस आता ‘नैसर्गिक आपत्ती’; मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय)

कानाकोपऱ्यात शिवसेना आम्ही पोहचवली. आमच्यावर राग धरला. बाळासाहेब तुला सुरक्षित करून गेले, आता आम्ही ऐकणार नाही आदित्य सुरक्षित नाही त्याला कारण तू आहेत, दुश्मन वाढवत आहे. ही आघाडी प्रामाणिक नाही बिघाडी आहे. निवडणुकीच्या तोंडावर काय होईल कळेलच. भाजपचे पुढच्या निवडणुकीत ४०० वर खासदार असतील. फडणवीस मोदी, शहा यांच्यावर टीका करता आहेत याला माफी नाही, याची भरपाई होणार,साहेबांनी तुम्हाला सुरक्षित केले आहे, पण आता नाही. तुम्ही खालचा तळ गाठला आहे आता घराचा तळ उद्धवस्त करणार आहे, असेही नारायण राणे म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.