आधी धमकी नंतर माफी! सामंतांना जाळून टाकू म्हणणाऱ्याने मागितली माफी; म्हणाला…

161

कोकणात होणाऱ्या रिफायनरी प्रकल्पाला काही लोकांचा विरोध होतोय तर काही लोकांचे समर्थन आहे. या प्रकल्पाचे विरोधक नरेंद्र जोशी यांनी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांना थेट पोलिसांसमोरच जाळून मारण्याची धमकी दिली आहे. “रिफायनरी प्रकल्प झाला तर उदय सामंत यांना जाळून टाकू”, असे म्हणत नरेंद्र जोशी यांनी उदय सामंत यांना धमकी दिली मात्र त्यानंतर नरमाईची भूमिका घेत माफी देखील मागितली.

अशी मागितली माफी

आता जोशी यांनी त्यांच्या वक्तव्याबाबत आता माफी मागितली आहे. ही माफी मागताना ते म्हणाले, उदय सामंत यांच्याबद्दल जे अपशब्द वापरले गेले त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो, आम्ही गुन्हेगार नाही आहोत, आम्ही गुन्हेगार नाही. आमचे म्हणणे सरकारपर्यंत पोहचत नसून सरकार आमची दखल घेत नाही. आम्हाला हा प्रकल्प नकोय, असे जोशी म्हणाले. सरकारकडून जी दडपशाही चालली आहे. त्या अनुषंगाने माझ्याकडून जे काही शब्द निघाले त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो, असेही ते म्हणाले.

(हेही वाचा – Make in India! कोरोनानंतर आता लम्पी व्हायरसवरही स्वदेशी लस)

उदय सामंतांच्या विरोधात रिफायनरीचे विरोधक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. रिफायनरी समर्थक आणि विरोधक यांनी राजापुरात नाना पटोले यांची भेट घेतली. यावेळी आपली भूमिका मांडताना रिफायनरी विरोधकांचा संताप अनावर झाला. त्यानंतर त्यातील जोशी यांनी उदय सामंत यांना जाळून मारण्याची धमकी दिली. रिफायनरी प्रकल्पाचे विरोधक नरेंद्र जोशी यांचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत असून पोलिसांनी आता या प्रकरणात चौकशीचे आदेश दिले आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.