हे लोक कधी तुमच्या घरी घुसतील आणि… मलिकांचा राणेंना इशारा

118

एनसीबीने कॉर्डेलिया क्रूझवर केलेल्या कारवाईला राज्यात गेल्या काही दिवसांपासून राजकीय वळण लाभले आहे. शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला या प्रकरणी एनसीबीने अटक केल्यानंतर ही कारवाई भाजपाच्या सांगण्यावरुन करण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी केला होता. त्यावरुन आर्यन खान मुस्लिम असल्यामुळे मलिक बोलत आहेत, पण सुशांत सिंह राजपूतच्या बाबतीत ते गप्प होते, अशी टीका राणेंनी केली होती.

त्याला आता नवाब मलिक यांनी प्रत्त्युत्तरादाखल नितेश राणेंना एक इशारा दिला आहे. सावध राहा, हे लोक कधी तुमच्या घरात घुसतील आणि तुमचेच लोक कधी तुरुंगात जातील, हे तुम्हाला कळणारही नाही, असा इशारा नवाब मलिक यांनी नितेश राणेंना दिला आहे.

(हेही वाचाः ड्रग्स पार्टीत पार्थ पवार? एनसीबी म्हणते ‘चौकशी सुरु आहे!’)

पत्रकार परिषदेवर प्रश्नचिन्ह

नवाब मलिक यांनी एनसीबीचे अधिकारी ग्यानेश्वर सिंग यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेवरही काही प्रश्न उपस्थित केले आहेत. ११ लोकांना ताब्यात घेण्यात आले होते आणि एनसीबीने 3 लोकांना सोडले. तर, एनसीबी म्हणत आहे ११ नाही, १४ लोकं होते. तीन लोकांना सोडण्यात आले आहे. ते लोक कोण होते? त्यांचं फुटेज जाहीर करा, असं आव्हान नवाब मलिकांनी एनसीबीला केले आहे.

काय म्हणाले होते नितेश राणे?

मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन एनसीबी आणि भाजपावर जोरदार टीका केली होती. यावर भाजपा नेते नितेश राणे यांनी सवाल केले. नवाब मलिक इतके ओरडत का आहेत? कारण तो खान आहे!!, तो सुशांत सिंह राजपूत नाही? फक्त त्याचे नाव खान असल्यामुळे तो बळी पडला? सुशांत हिंदू होता म्हणून तो ड्रग अ‍ॅडिक्ट झाला ??, असा तिखट सवाल नितेश राणे यांनी नवाब मलिक यांना केला होता.

(हेही वाचाः नवाब मलिकांना ड्रग्ज विक्री करणाऱ्यांची चिंता!)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.