मलिकांना पुन्हा झाली पाहुण्यांची आठवण! म्हणाले…

101

मागील काही दिवसांपूर्वी एनसीबीचे प्रमुख समीर वानखेडे यांच्यावर एकामागोमाग एक गंभीर आरोप करून चर्चेत आलेले एनसीपीचे प्रवक्ते नवाब मलिक यांना आता इतर नेत्यांप्रमाणे त्यांच्यावरही केंद्रीय तपस यंत्रणांची कारवाई होईल, असे वाटू लागले आहे. याआधी त्यांनी ट्विट करून आपल्या घरी पाहुणे येणार आहेत, असे सांगितले होते, मात्र प्रत्यक्षात तसे काही घडले नाही, मात्र आता मलिक यांना पुन्हा पाहुण्यांची आठवण झाली आहे. मलिक यांनी रविवारी, १९ डिसेंबर रोजी रात्री उशिरा ट्विट करून सॊमवारी सकाळी आपल्या घरी पाहुणे येणार आहेत, असे ट्विट करून पुन्हा चर्चा घडवली आहे.

काय म्हणाले नवाब मलिक!

गेल्या काही दिवसांपासून नवाब मलिक यांनी आपली चौकशी होणार, अशी शक्यता बोलून दाखवली आहे. रविवारी त्यांनी पुन्हा एकदा मलिक यांनी ट्वीट करून तास दावा केला आहे. ‘उद्या सकाळी काही सरकारी पाहुणे माझ्या घरी येणार असल्याची माहिती मला मिळाली आहे, ते माझ्या येणार अशी माहिती मिळाली आहे, त्यामुळे मी त्यांचे चहा आणि बिस्किटाने मनापासून स्वागत करण्यास तयार आहे. त्यांना योग्य पत्ता हवा असल्यास ते मला कॉल करू शकतात, असा टोलाही मलिक यांनी लगावला.

याआधीही १० डिसेंबर रोजी नवाब मलिक यांनी ट्वीट करून असाच दावा केला होता. ‘साथियों, सुना है, मेरे घर आज कल मे सरकारी मेहमान आने वाले है, हम उनका स्वागत करते है’ असं म्हणत मलिक यांनी सरकारी संस्थेकडून चौकशीचे संकेत दिले होते.

(हेही वाचा : करायचे होते पेट्रोल-डिझेल स्वस्त, पण ठाकरेंनी केली दारु स्वस्त)

काही दिवसांपूर्वीच, वानखेडे कुटुंबावर मलिक यांनी आरोप केल्यामुळे एकच खळबळ उडवून दिली होती. याच प्रकरणी समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी मलिक यांना त्यांचे आरोपसत्र थांबावे म्हणून उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मलिक यांच्याविरोधात १ कोटी २५ लाखांचा अब्रूनुकसानीचा दावा केला. तसेच, मलिक यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून टीका करण्यास मनाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली होती. या प्रकरणी मलिक यांनी प्रतिज्ञापत्र सादर करत उच्च न्यायालयात माफी मागितली होती. तसेच, यापुढे कोणतीही विधाने करणार नाही, अशी हमीच मलिक यांनी न्यायालयात दिली होती.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.