अडचण वाढली! एनसीबीच्या समीर वानखेडेंची विभागीय चौकशी

93

एनसीबीचे मुंबई संचालक समीर वानखेडे यांची आर्यन खान प्रकरणात झालेल्या २५ कोटीच्या कथित डील प्रकरणात एनसीबीने विभागीय चौकशी लावण्यात आली आहे. चौकशीसाठी वानखेडे यांना दिल्लीत बोलवण्यात आलेले असून या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी दिल्लीहून तीन अधिकारी मुंबईकडे रवाना झाले आहेत.

आर्यनला सोडण्यासाठी २५ कोटींची मागणी

क्रूझ रेव्ह पार्टी प्रकरणात आर्यन खान याला सोडण्यासाठी २५ कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती, मात्र हा सौदा १८ कोटीला निश्चित करण्यात आला. त्यापैकी ८ कोटी रुपये समीर वानखेडे यांना देण्यात येणार होते, असा कथित आरोप या प्रकरणातील स्वतंत्र साक्षीदार प्रभाकर साईल याने केला आहे. तसेच त्याने स्वतः एक प्रतिज्ञापत्र तयार केले आहे. या प्रतिज्ञापत्राची दखल एनसीबीचे केंद्रात बसलेल्या महासंचालक यांनी घेतली असून याप्रकरणी समीर वानखेडे यांची विभागीय चौकशी लावली आहे.

(हेही वाचा –‘बायकोनं मारलं तरी सांगतील केंद्राचा हात आहे’; फडणवीसांचा टोला)

दोन अधिकारी यांना मुंबईकडे रवाना

समीर वानखेडे यांची विभागिय चौकशी दिल्ली येथे एनसीबीच्या मुख्य कार्यलायत होणार असून समीर वानखेडे यांना दिल्ली येथे बोलवण्यात आले आहे. वानखेडे यांच्या चौकशीसाठी एक विशेष दक्षता पथक तयार करण्यात आले असून हे पथक वानखेडे यांच्यावर लावण्यात आलेल्या कथित आरोपाची चौकशी करतील. दरम्यान, क्रूझ रेव्ह पार्टी गुन्हयावर याचा परिणाम होऊ नये म्हणून एनसीबीचे डीआयजी ज्ञानेश्वर सिंह यांना या प्रकरणात लक्ष देण्यास सांगून दिल्ली येथून प्रकरणाचा तपास करण्यासाठी दोन अधिकारी यांना मुंबईकडे रवाना करण्यात आले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.