राज्यसभेच्या सहा जागांसाठी होणारं मतदान आता पूर्ण झालं आहे. सर्वच पक्ष आणि अपक्षांच्या आमदारांचे मतदान पूर्ण झाले असून, आता या निवडणुकांच्या निकालाकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांसाठी ही निवडणूक म्हणजे अस्तित्वाची लढाईच मानली जात आहे.
त्यामुळे या दोन्ही पक्षांच्या उमेदवाराला मिळणारं एकेक मत हे फार महत्वाचं आहे. महाविकास आघाडीत शिवसेनेसोबत असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आपली अतिरिक्त मते ही शिवसेनेच्या दुस-या उमेदवाराला दिल्यामुळे आता संजय पवारांच्या मतांमध्ये वाढ झाली आहे.
(हेही वाचाः आदित्य ठाकरेंच्या मतपत्रिकेमध्ये झाली गडबड, नंतर झालं काय?)
विजय कुणाचा?
शिवसेनेचे राज्यसभेसाठीचे दुसरे उमेदवार संजय पवार यांना शिवसेनेची 13, राष्ट्रवादी काँग्रेसची 9 तर काँग्रेसची दोन अतिरिक्त मतं मिळाली आहेत. त्यामुळे आता पवार यांच्या मतांमध्ये या 24 अतिरिक्त मतांची भर पडली आहे. पण निकाल अपक्षा आणि छोट्या पक्षांच्या आमदारांनी नेमके कोणाला झुकते माप दिले, हे निश्चित नसल्यामुळे अजूनही संजय पवार यांच्या विजयाबाबत साशंकताच असल्याचे बोलले जात आहे.
बविआ गेम चेंजर?
बहुजन विकास आघाडीचे विधानसभेत तीन आमदार आहेत. त्यामुळे या तिन्ही आमदारांची मते नेमकी कोणाला जातात, यावर निवडणुकीचं गणित अवलंबून असल्याचं बोललं जात आहे. बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर यांनी आपली भूमिका मतदान होईपर्यंत न सांगितल्यामुळे त्यांची मते नेमकी कोणाला जातात हे अजूनही गुलदस्त्यातंच आहे.
(हेही वाचाः नवाब मलिक आणि अनिल देशमुखांच्या मतदानाच्या आशा मावळल्या)
Join Our WhatsApp Community