सत्ता मिळवण्यासाठी फडणवीसांची तळमळ… नाथा भाऊंच्या कानपिचक्या

एखाद्या पक्षाने त्यांना ऑफर दिली तरी ते सत्ता स्थापन करतील, असा टोला नाथा भाऊंनी लगावला आहे.

75

मागील आठवड्यात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ खडसे यांच्या घरी सदिच्छा भेट दिल्यानंतर, राजकीय वातावरणात उलट-सुलट चर्चा सुरू झाली होती. मात्र आता नाथा भाऊंनी थेट देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.
सत्ता गेल्यापासून देवेंद्र फडणवीस हे अस्वस्थ आहेत, त्याचमुळे ते आजही सत्ता स्थापन करण्यासाठी तळमळत असल्याची टीका एकनाथ खडसे यांनी केली आहे. सत्तेत आले पाहिजे म्हणून आजही सरकार स्थापन करण्याची त्यांची तळमळ दिसत आहे, असा टोला खडसे यांनी लगावला.

हे सरकार मजबूत

हे सरकार पडणार असे स्वतःच्या आमदारांना ते सांगत आहेत पण त्यांचे आमदार सध्या अस्वस्थ आहेत. महाविकास आघाडी सरकार जन्माला आल्यापासून, हे सरकार पडणार असल्याचे चंद्रकांत पाटील सांगत आहेत. सरकार पडणार असल्याच्या चंद्रकांतदादांनी दोन तारखाही दिल्या. फडणवीसांनीही तारीख निश्चित केली होती, पण काही होत नाही. सरकार काही जात नाही. विरोधक वाट बघत आहेत. ते वाटच बघत राहतील, असा टोलाही नाथा भाऊंनी लगावला. खरं सांगायचं तर राज्यातील आघाडी सरकार दिवसे न् दिवस मजबूत होत असल्याचे त्यांनी सांगितले.

(हेही वाचाः देवेंद्र फडणवीस नाथा भाऊंच्या घरी, पण नाथा भाऊ मात्र मुंबईत)

ऑफर दिली तर सत्ता स्थापन करतील

फडणवीस अस्वस्थ आहेत. कोणत्याही कारणाने सत्तेत आलं पाहिजे म्हणून त्यांनी अजितदादांसोबत सरकार स्थापन केले. आता त्यांनी चूक मान्य केली आहे. पण चूक मान्य केल्यानंतर अजूनही असा प्रसंग आला किंवा एखाद्या पक्षाने त्यांना ऑफर दिली तरी ते सत्ता स्थापन करतील, असा टोला नाथा भाऊंनी लगावला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.