दोघा-चौघांना आधीच आत टाकलं असतं तर…, खडसेंकडून गृहमंत्र्यांची कानउघडणी

131

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्यातील वाद आता पुन्हा एकदा उफाळून आला आहे. जळगावात एका कार्यक्रमात बोलताना खडसे यांनी फडणवीसांवर जोरदार टीका केली. दिलीप वळसे पाटील यांनी भाजपवाल्यांना आपल्या गृहमंत्रीपदाचा हिसका दाखवा, दोन-चार जणांना इंगा दाखवला असता तर ही परिस्थिती आली नसती, असंही यावेळी एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे.

…तर आज ही परिस्थिती आली नसती

फडणवीस यांनी गुरुवारी शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेनंतर खडसे यांनी त्यांच्यावर निशाणा साधला. मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी क्षमता लागते, जनतेने 40 वर्षे आम्हाला निवडून दिलं. माझेच पाय आणि बोट धरणारी पोरं आज मला शिकवायला लागले आहेत आणि शरद पवार यांच्याबाबत बोलत आहेत, याचं मला आश्चर्य वाटतं. मी दिलीप वळसे पाटील यांना अनेकदा सांगत असतो की तुम्ही तुमच्या गृहमंत्रीपदाचा हिसका यांना दाखवा. यांची शेकडो प्रकरणे आहेत, भाजपच्या दोन-चार लोकांना जर वर्षापूर्वी टाकून दिलं असतं, तर आज ही परिस्थिती आली नसती, असं विधान खडसे यांनी केलं आहे.

(हेही वाचाः मेहुण्याच्या कंपनीत ‘मनी लाँड्रिंग’, तुमचे संबंध काय? सोमय्यांचा उद्धव ठाकरेंना सवाल)

हम तो डुबेंगे लेकिन तुमको भी लेके डुबेंगे

जे सत्य आहे ते करा, कुणाला छळू नका, द्वेषाचं राजकारण करू नका, पण ज्यांनी जे केलं आहे ते त्यांना भोगायला लावा, अशी जनतेच्या मनातली इच्छा आहे. अनिल देशमुखांच्या घरावर शंभराच्या वर धाडी पडतात. भूखंड घोटाळ्याशी काहीही संबंध नसताना मला अडकवायचा प्रयत्न केला जात आहे. आम्हाला जेलमध्ये जावं लागेल असं बोललं जात आहे, पण हम तो डुबेंगे लेकिन तुमको भी लेके डुबेंगे, असा गंभीर इशाराही खडसे यांनी भाजपला दिला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.