.. तर शिंदे-फडणवीस सरकार कोसळणार; माजी भाजप नेत्याचा दावा

83

एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांसह वेगळी चूल मांडली आणि राज्यात भाजपसोबत येत मोठं सत्तांतर घडवून आणलं. शिंदे- फडणवीस सरकार आल्यापासूनच महाविकास आघाडीकडून सातत्याने टीकेची झोड उठवली जात आहे. अशातच शिंदे गटात विविध कारणांमुळे नाराजी असल्याच्या वावड्याही उठवल्या जात आहेत. सध्या कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर विरोधकांकडून गेल्या काही दिवसांपासून सातत्याने टीका केली जात आहे. मात्र, अब्दुल सत्तार यांनी थेट शिंदे गटावरच याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. याच नाराजीतून शिंदे गटामध्ये अस्वस्थता निर्माण झाल्याचे म्हटले जात असून, हे सरकार कोसळू शकते, असा दावा राष्ट्रवादी विधान परिषदेचे आमदार एकनाथ खडसे यांनी केला आहे.

( हेही वाचा: चंद्राबाबू नायडू यांच्या सभेत पुन्हा चेंगराचेंगरी, तिघांचा मृत्यू )

सरकारचे भविष्य न्यायालयाच्या निर्णयावर अवलंबून

शिंदे- फडणवीस सरकारमधील आमदारांमध्ये एक प्रकारची अस्वस्थता आहे. एकमेकांची उणीदुणी काढली जात आहेत, असे अब्दुल सत्तार यांनीच सांगितले आहे. न्यायालयाच्या निकालाची टांगती तलवार अजूनही यांच्यावर आहे. न्यायालयाचा काय निकाल येतो त्यावर या सरकारचे भवितव्य अवलंबून आहे.अशा स्थितीमध्ये अस्वस्थता वाढली तर हे सरकार कोसळू शकते, असा दावा एकनाथ खडसे यांनी केला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.