नशीब… राऊत काठावर वाचले, भुजबळांनीच दिली कबुली

95

राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला आपला उमेदवार निवडून आणण्यात अपयश आल्यानंतर सत्ताधा-यांकडून याबाबत प्रतिक्रिया देण्यात येत आहेत. सत्ताधा-यांनी या पराभवाची जबाबदारी आता स्वीकारली असून, आपण उमेदवार निवडून आणण्यात अपयशी ठरल्याचे मविआ नेत्यांकडून सांगण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री छगन भुजबळ यांनी देखील यावर भाष्य केले आहे.

(हेही वाचाः पॉलिटिकल करेक्ट कार्यक्रम होईल, फडणवीसांच्या विधानाने खळबळ)

नाहीतर उलट झालं असतं…

हा निकाल अतिशय धक्कादायक ठरला आहे. यामध्ये शिवसेनेचे उमेदवार संजय राऊत हे काठावर वाचले. नाहीतर संजय पवार निवडून आले असते आणि संजय राऊत मागे राहिले असते तर चित्र उलट झालं असतं. हे असं झालं नाही हेच आमचं नशीब आहे, असे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. तसेच सहावा उमेदवार निवडून आणण्यात आम्ही अपयशी ठरल्याची कबुली देखील त्यांनी दिली आहे.

(हेही वाचाः सत्ता डोक्यात जाऊन द्यायची नसते, फडणवीसांचा राऊतांना झणझणीत टोला)

फडणवीसांनी साधला निशाणा

या निवडणुकीच्या निकालानंतर देवेंद्र फडणवीस यांनी देखील संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांनी जेव्हापासून घोडेबाजार म्हणायला सुरुवात केली, तेव्हापासूनच त्यांच्या आमदारांना ठरवलं की, आपल्याला घोडा म्हणणा-यांना आपली गरज नाही. संजय राऊतांपेक्षा जास्त मतं आमचे तिसरे उमेदवार धनंजय महाडिक यांना मिळाली आहेत, याचं आत्मपरिक्षण संजय राऊत यांनी करायला हवं, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे. सत्ता येते, जाते पण ती इतक्या डोक्यात जाऊन द्यायची नसते, अशी बोचरी टीका देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊतांवर केली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.