पंतप्रधान मोदींच्या भाषणावर शरद पवारांची टीका, म्हणाले…

105

नागपूरमध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी भाषणामध्ये विरोधकांवर टीका केली. ते पक्षाच्यावतीने किंवा निवडणुकीच्या निमित्ताने जाहीरसभेसाठी गेले, त्याठिकाणी त्यांनी पक्षाची भूमिका मांडली किंवा विरोधकांवर टीका टिप्पणी केली, तर तो त्यांचा 100 टक्के अधिकार आहे. पण एखाद्या रेल्वेचे, रस्त्याचे किंवा हॉस्पिटलचे उद्घाटन करणे, हे सरकारी कार्यक्रम आहेत. अशा सरकारी कार्यक्रमांचे उद्घाटन देशाचा पंतप्रधान करत असतो, तेव्हा सरकारी कार्यक्रमाच्या व्यासपीठावरून विरोधकांवर टीका करणे, कितपत शहाणपणाचे आहे? याचा विचार करण्याची वेळ आली आहे, अशा शब्दांत शरद पवारांनी पंतप्रधानांना लक्ष्य केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवारी, ११ डिसेंबर रोजी शिर्डी ते नागपूर दरम्यानच्या समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या भाषणावर एनसीपीचे अध्यक्ष शरद पवार यांनी टीका केली.

विरोधी पक्ष याही लोकशाहीच्या संस्था 
मी आतापर्यंत अनेक पंतप्रधानांचे कार्यक्रम पाहिली आहेत. भाषणे ऐकली आहेत. अगदी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यापासून त्यानंतरचे वेगवेगळ्या पंतप्रधानांना ऐकले आहे. पंडित नेहरू निवडणुकीच्या प्रचाराला गेल्यानंतरही त्यांनी विरोधी पक्षाची सरकारे असली तरी त्यांच्यावर कधी टिप्पणी केली नाही. त्यांनी आपली भूमिका मांडली. पण विरोधक, विरोधी पक्षनेता, विरोधी पक्ष याही लोकशाहीच्या संस्था आहेत, त्यांचा सन्मान ठेवला पाहिजे, हे संकेत आपल्या देशाच्या जवळपास प्रत्येक पंतप्रधानांनी पाळले. पण आज काही हे पाळले जात नाही, असेही शरद पवार म्हणाले.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.