कोरोनाची परिस्थिती भयानक असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक सारखे ठाकरे सरकारमधले भिकार मंत्री रोज उठून फालतू राजकारण करत आहेत. पण ग्रामीण भागामध्ये ही भयावह परिस्थिती रोज बिकट होत चालली आहे, या मंत्र्यांना गोळ्या घातल्या पाहिजेत अशी संतप्त प्रतिक्रिया भाजपचे नेते व महाराष्ट्र प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे यांनी व्यक्त केली आहे.
काय आहे निलेश राणे यांचे ट्वीट?
राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचा कहर पहायला मिळत आहेत. कोरोनाचा प्रभाव कमी करण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आला. लॉकडाऊन करुनसुद्धा कोरोनाची परिस्थिती हाताबाहेर जात आहे. मात्र ठाकरे सरकारमधील मंत्री आरोप करण्यामध्येच व्यस्त आहेत. ऑक्सिजन, बेड, रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध नसल्याने रुग्णांना पाया पडायला लागत आहेत. ऑर्डर दिल्यानंतर दहा दिवसांनी ऑक्सिजन, रेमडेसिवीर इंजेक्शन मिळत आहे.
नवाब मलिक सारखे ठाकरे सरकार मधले भिकार मंत्री रोज उठून फालतू राजकारण करत आहेत पण ग्रामीण भागांमध्ये ही भयावह परिस्थिती रोज बिकट होत चालली आहे. या मंत्राना गोळ्या घातल्या पाहिजे, रोज उठून गरज नसलेल्या गोष्टी मीडियासमोर बोलून महाराष्ट्राची दिशाभूल करतायेत. pic.twitter.com/982bFS5emO
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) April 20, 2021
(हेही वाचाः राज्य सरकारने जनतेला वाऱ्यावर सोडू नये… पटोलेंचा सल्ला!)
राज्यात अत्यंत भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे. एवढंच नव्हे ग्रामीण भागात रुग्ण पॉझिटिव्ह आला, तर त्याला रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहिका देखील वेळेवर मिळत नाहीत. अक्षरशः खाजगी वाहनातून रुग्णांना रुग्णालयात दाखल केले जात आहे. राज्यात परिस्थिती भयानक असताना ठाकरे सरकारमधील मंत्री रोज उठून गरज नसलेल्या गोष्टी मीडियासमोर बोलून महाराष्ट्राची दिशाभूल करत आहेत. अशी प्रतिक्रिया निलेश राणे यांनी आपल्या ट्वीटद्वारे मांडली आहे.
याआधीही केली होती टीका
ब्रुक फार्मा कंपनीच्या मालकाला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, आमदार प्रसाद लाड डिसीपी कार्यालयात दाखल झाले होते. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व अल्पसंख्यांक मंत्री नवाब मालिकांनी केलेल्या आरोपांना, भाजपाच्यावतीने निलेश राणे यांनी चोख उत्तर दिले होते. नवाब मलिक स्वतःलाच चावलंय वाटतं, अशा शब्दांत त्यांनी नवाब मलिक यांच्यावर टीका केली होती. कोरोना रुग्णांना आरोग्य सेवा चांगली देऊन रुग्णांचे जीव वाचवा, असे देखील निलेश राणे यांनी सांगितले.
Join Our WhatsApp Community