राणा दाम्पत्याला दणका! न्यायालय म्हणतंय, तुरुंगातलंच जेवण करा!

195

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानाबाहेर हनुमान चालीसा पठणाचा आग्रह धरल्यानंतर अटक करण्यात आलेले खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या जामीन अर्जावर शुक्रवारी मुंबई सत्र न्यायायलात सुनावणी पार पडली. राणा दामप्त्याला अटक केल्यानंतर न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर न्यायालयाने त्यांच्या जामीन अर्जावर शुक्रवारची तारीख दिली होती. मात्र राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जावर शुक्रवार ऐवजी आज शनिवारी सुनावणी होणार आहे. त्यामुळे दोघांचा तुरुंगातील मुक्काम एक दिवसाने वाढला होता. आता आजच्या सुनावणीमध्ये काय होणार, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. त्यापूर्वी राणा दाम्पत्याला सत्र न्यायालयाने आणखी एक दणका दिला आहे.

न्यायालयाने फेटाळला अर्ज

मिळालेल्या माहितीनुसार, आपल्याला तुरुंगात घरचं जेवण मिळावं यासाठीचा खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी अर्ज केला होता. मात्र सत्र न्यायालयाने हा अर्ज फेटाळून लावला आहे. गुरुवारी राणा दाम्पत्याने मुंबई सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. मात्र न्यायालयाने हा अर्ज फेटाळल्याचे समोर आले आहे.

तुरूंगातील मुक्काम वाढला

दरम्यान, राणा दामप्त्याना अटक केल्यानंतर त्या दोघांवर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला. यापार्श्वभूमीवर राणा दाम्पत्याकडून मुंबई सत्र न्यायालयात जामीनासाठी अर्ज करण्यात आला होता, या अर्जावर शुक्रवारी सुनावणी होणार होती. मात्र सुनावणीला सुरूवात झाल्यानंतर व्यस्त कामांमुळे पुढील सुनावणी लांबणीवर गेल्याचे न्यायमूर्तींनी सांगितले त्यामुळे आणखी एक दिवस राणा दाम्पत्याचा तुरूंगातील मुक्काम वाढला आहे.

न्यायाधीश काय म्हाणाले…

न्यायाधीश राहुल रोकडे यांनी स्पष्ट केले की, न्यायालयाच्या शुक्रवारच्या वेळापत्रकानुसार, इतर महत्त्वाची प्रकरणंही सुनावणीसाठी आहेत. त्यामुळे न्यायालयाकडे वेळ नाही. त्यामुळे राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जावर शनिवारी सुनावणी घेण्यात येणार आहे. २४ एप्रिलपासून राणा दाम्पत्य हे न्यायालयीन कोठडीत असून त्यांनी केलेल्या जामीन अर्जावर शुक्रवारी सुनावणी होणार होती. व्यस्त कामकाजामुळे न्यायालयाच्या वतीने गेल्या सुनावतीच स्पष्ट करण्यात आले होते की, शक्य झाल्यासच आम्ही शुक्रवारी ही सुनावणी घेऊ. त्यानुसार, याचिकाकर्त्या राणा दाम्पत्याचे वकिल आबाद फोंडा यांनी युक्तीवाद केला. त्यांनी न्यायालयाला विनंती केली की, याचिकाकर्ते दाम्पत्य निवडून आलेले आमदार आणि खासदार आहेत. हे प्रतिष्ठित लोकप्रतिनिधी आहेत. त्यामुळे त्यांच्यावर अन्याय होऊ नये, यासाठी आज थोडा वेळ का होईना न्यायालयाला शक्य असल्यास ते युक्तीवाद करण्यास तयार आहेत. ते सराईत गुन्हेगार नाहीत. ते कुठेही पळून जाणार नाहीत. त्यांनी कोणताही गंभीर गुन्हा केलेला नाही.

(हेही वाचा – Money Laundering Case : अनिल देशमुखांचा कोठडीतील मुक्काम वाढला)

दरम्यान विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी राज्य सरकारच्या वतीने राणा दाम्पत्याच्या जामीनाला जोरदार विरोध केला. संपूर्ण प्रकरणावर लेखी म्हणणंही सादर केले. यात म्हटले आहे की, मुख्यमंत्र्यांच्या बाबत अपशब्द वापरून त्यांना चॅलेंज केले. तसेच शासनाला चॅलेंज केले आहे. त्यांना १४९ अंतर्गत नोटीस देण्यात आली होती की, तुम्ही शांतता ठेवणं तुमचं कर्तव्य आहे त्यामुळे तुम्ही परत जा. पण त्यांनी त्या नोटीसला न जुमानता शासनाला आव्हान दिलं. आरोपींविरोधात १२४ अ अंतर्गत राजद्रोहाचा सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.