पडळकरांच्या जिवाला धोका नाही! मंत्री अनिल परब यांची भूमिका 

76

लोकप्रतिनिधी सत्ताधारी पक्षाचा असो किवा विरोधी पक्षाचा, कुणाच्याही जीविताला धोका निर्माण झाला तरी त्यांना संरक्षण पुरवण्याचे कर्तव्य राज्य सरकारचे आहे. गोपीचंद पडळकर हे राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचा-यांच्या संपात सहभागी झाले म्हणून त्यांच्या जीविताला धोका आहे, असे आपल्याला बिलकूल वाटत नाही, अशी भूमिका परिवहन मंत्री अनिल परब यांनी मांडली.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यासंबंधी राज्य सरकारला पत्र लिहून भाजप नेते गोपीचंद पडळकर यांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे, असे म्हटले. राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणांविरोधात आंदोलन करणाऱ्या गोपीचंद पडळकरांच्या जीवाला धोका आहे. बहुजनांच्या बाजूने उभे राहिल्याने यातून दुखावलेले लोक त्यांच्यावर सातत्याने हल्ला करत आहेत. लोकशाहीत विरोधकांचा आवाज हिंसेने दाबणे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. विरोधक असो वा सत्ताधारी, ज्याचा जिवास धोका त्याला संरक्षण दिले पाहिजे आणि म्हणूनच विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांना तात्काळ विशेष सुरक्षा द्यावी, अशी मागणी फडणवीस यांनी केली आहे.

(हेही वाचा मलिकांकडून अनिल बोंडेंची कथित ऑडिओक्लिप व्हायरल! काय केला आरोप?)

पडळकर सरकारच्या विरोधात बोलतात

त्यावर परिवहन मंत्री अनिल परब म्हणाले की, गोपीचंद पडळकर हे नेहमी सरकारच्या विरोधात बोलतात, सध्या ते एसटी कर्मचा-याच्या संपात सहभागी आहेत. त्यांच्या जीविताला धोका असल्याचे देवेंद्र फडणवीस यांचे म्हणणे आहे. मात्र त्यांच्या जीवाला धोका असल्याचे आपल्याला वाटत नाही, असे मंत्री परब म्हणाले.

पर्याय व्यवस्था उभारणार 

संपावर गेलेलया परिवहन महामंडळाच्या कर्मचा-यांना कामावर रुजू राहण्याचा आदेश दिला आहे. त्याप्रमाणे अडीच हजार कर्मचारी सहभागी झाले आहेत. अजून नोटीसला २४ तास पूर्ण झाले नाहीत. त्यानंतर त्यावर पर्यायी व्यवस्था उभी करण्यात येईल, त्याचा विचार करावाच लागेल, अशा शब्दांत परिवहन मंत्री अनिल परब यांनी संपकरी कर्मचा-यांना इशारा दिला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.