पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमाद्वारे देशभरातील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. हा कार्यक्रम दिल्लीतील प्रगती मैदान येथील भारत मंडपम येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमादरम्यान बोर्डाच्या परीक्षेपूर्वीचा (Board Exams) ताण आणि भीती कमी करण्यासाठी पंतप्रधान मोदी आठव्यांदा विद्यार्थी (Student), शिक्षक आणि पालकांशी परीक्षांबद्दल संवाद साधला. यावेळी मोदींनी परीक्षा पे चर्चा (Pariksha pe charcha) या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. याशिवाय मोदींनी मुलांना गणित कसे हाताळायचे याचे तंत्र देखील शिकवले. (Pariksha Pe Charcha 2025)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘परीक्षा पे चर्चा’ हा कार्यक्रम सोमवारी, १० फेब्रुवारी रोजी पार पडला. तसेच या कार्यक्रमासाठी देशभरातून विद्यार्थी, पालक आणि शिक्षक सहभागी झाले होते. सोमवारच्या कार्यक्रमासाठी ३.३० कोटींपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी आणि २०.७१ पेक्षा जास्त शिक्षकांनी नोंदणी केली होती. यातील निवडक २५०० जणांनी प्रत्यक्ष या कार्यक्रमात भाग घेतला होता.
(हेही वाचा – Ind vs Eng, 2nd ODI : वरुण चक्रवर्ती एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा सगळ्यात वयस्कर क्रिकेटपटू)
नेतृत्व गुण विकसित करा
पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांना अभ्यासाचा कानमंत्र देतानाच नेतृत्व गुण कसे विकसित करायचे हे सुद्धा सांगितलं. लीडरला टीम वर्क शिकणं महत्त्वाचं आहे. कुणाला काम दिलं असेल तर त्यातील अडचणी समजून घेतल्या पाहिजे. जिथे कमी, तिथे आम्ही हा सिद्धांत तुम्ही मनात बिंबवून ठेवा. लोकांचा विश्वासच तुमच्या लीडरशीपला मान्यता देईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
आव्हानांचा सामना करा
यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना आव्हानांना सामोरे जाण्याचाही कानमंत्र दिला. तुम्हाला तुमच्यातील आव्हानांचा सामना करावा लागेल. मागच्यावेळी तुम्हाला 30 मार्क होते, तर तुम्हाला यावेळी 35 मार्क मिळवण्याचा प्रयत्ने केला पाहिजे. असं करून तुम्ही तुमचं टार्गेट वाढवलं पाहिजे. हे तुमच्यासाठी एक आव्हान आहे आणि तुम्हाला त्याच्याशी लढलं पाहिजे, असे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
Had a wonderful interaction with young students on different aspects of stress-free exams. Do watch Pariksha Pe Charcha. #PPC2025. https://t.co/WE6Y0GCmm7
— Narendra Modi (@narendramodi) February 10, 2025
आरोग्याची काळजी कशी घ्यावी?
यावेळी एका विद्यार्थ्याने परीक्षा जवळ आल्यावर वेळेचे नियोजन आणि आरोग्याची काळजी कशी घ्यावी? असा प्रश्न विचारला. त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सविस्तर उत्तर दिले. “वेळेचे योग्य नियोजन केले पाहिजे. मिळालेल्या वेळेचा चांगला उपयोग करता आला पाहिजे. दुसऱ्या दिवसाचे नियोजन करावे. विनाकारण वेळ घालवू नका. गप्पांमध्ये किंवा इतर विषयांवर बोलण्यापेक्षा परीक्षेवर लक्ष केंद्रीत केले पाहिजे. अभ्यासाची तयारी करताना व्यवस्थित जेवण करा. पुरेशी झोप घ्यायला पाहिजे”, असा सल्ला पंतप्रधान मोदी यांनी दिला.
(हेही वाचा – Droupadi Murmu यांनी प्रयागराज येथे केले संगमस्नान; कुंभमेळ्यात स्नान करणाऱ्या दुसऱ्या राष्ट्रपती)
तुमच्या मनातलं तुमच्या पालकांना सांगा, तुम्हाला कधीही ताण येणार नाही
‘जर एक क्षण जगला नाही तर तो निघून जाईल आणि कधीही परत येणार नाही.’ तुम्ही तो जगा. पूर्वी तो शाळेतून परतल्यानंतर आईला सगळं सांगायचा, आता तो तसं करत नाही. हळूहळू आणि हळूहळू, तुम्ही आकुंचन पावू लागता. यानंतर तुम्ही नैराश्यात जाता. तुम्ही तुमच्या अडचणी कोणालाही न डगमगता सांगाव्यात. (Pariksha Pe Charcha 2025)
मुलांना पुस्तकांचे तुरुंग नव्हे तर मोकळे आकाश हवे
पंतप्रधान म्हणाले – बरं, तुम्ही नाचता तेव्हा तुम्हाला कसे वाटते? छान वाटते, बरोबर? तुम्ही तुमच्या पालकांना समजावून सांगितले पाहिजे की जर तुम्ही सतत अभ्यास केला तर ताण येईल. जर तुम्ही काहीतरी वेगळे केले तर ताण येणार नाही. जर आपण मुलांना भिंतीत बंद केले आणि पुस्तकांचा तुरुंग बनवला तर मुले कधीही विकसित होऊ शकणार नाहीत. त्यांना मोकळे आकाश आणि त्यांच्या आवडीच्या गोष्टी हव्या आहेत. जर मुल त्याच्या आवडीच्या गोष्टी करत असेल तर तो अभ्यासही करेल.
हेही पाहा –