PM Narendra Modi : काँग्रेसवाले एकमेकांनाच रन आउट करतात; राजस्थानच्या सभेत पंतप्रधान मोदींची तुफान फटकेबाजी

81

रविवार, १९ नोव्हेंबर रोजी गुजरातमध्ये ICC Cricket World Cup Final होत आहे, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया हा सामना होत आहे, त्याआधीच देशभरात क्रिकेटचा फिव्हर चढला असताना यातून राजकीय पक्षांच्या सभाही सुटल्या नाहीत. राजस्थानातील चुरू मतदारसंघातील तारानगरमध्ये प्रचारसभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) क्रिकेटचा परिभाषेत काँग्रेसचा समाचार घेतला.

काय म्हणाले पंतप्रधान मोदी? 

आज-काल देशावर क्रिकेटचा फिव्हर चढला आहे. पण क्रिकेटमध्ये बॅट्समन येतो आणि आपल्या देशासाठी रन्स बनवण्याचा प्रयत्न करतो, पण या काँग्रेसवाल्यांमध्ये भांडणेच एवढी आहेत की, ते एकमेकांनाच रन आउट करण्याच्या मागे लागले आहेत. राजस्थानातल्या काँग्रेस सरकारची पाच वर्षे काँग्रेसमधल्याच नेत्यांना एकमेकांना रन आउट करण्यात गेली निघून गेली. जे रन आउट झाले नाहीत आणि वाचले, ते महिलांविषयी वादग्रस्त विधाने करून हिट विकेट होत आहेत आणि जे हिट विकेट झाले नाहीत ते पैसे खाऊन, लाच देऊन स्वतःसाठी मॅच फिक्सिंग करत आहेत. काँग्रेसची टीमच एवढी खराब आहे की, हे काय रन बनवणार आणि राजस्थानच्या जनतेचे काय भले करणार?, हा प्रश्नच आहे, असे पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) म्हणाले. राजस्थानमधील सभेनंतर पंतप्रधान मोदी थेट अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर दाखल झाले.

(हेही वाचा Hindu : झारखंडमधील ४ मंदिरांत देवतांच्या मूर्तींची तोडफोड; हजारो हिंदू रस्त्यावर)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.