आजही जनतेचा मोदींवरच विश्वास! पवार-बॅनर्जी भेटीवर काय म्हणाले फडणवीस? 

117

२०१९ मध्येही देशभरात मोदींच्या विरोधात सर्व विरोधी पक्ष एकत्र आले होते, मात्र तरीही पंतप्रधान नरेंद्र मोदी विजयी झाले, भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले. आता २०२४ साठी पुन्हा एकदा विरोधक एकत्र येत आहेत, मात्र आजही देशातील जनतेचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरच विश्वास आहे. आणि तेव्हाही पुन्हा तेच निवडून येतील, असा विश्वास विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

शरद पवारांनाही हवी काँग्रेसशिवाय तिसरी आघाडी 

भाजपाच्या विरोधात सर्व विरोधकांना एकत्र करण्याचा प्रयत्न शरद पवार यांचा आहे. मात्र त्यामधून काँग्रेसला बाजूला करण्याचा निर्णय घेण्यात येत आहे. तसा थेट उच्चार ममता बॅनर्जी यांनी केला आहे. शरद पवार यांचेही हेच मत आहे, मात्र ते थेट बोलत नाही, कारण राज्यात त्यांना अडचण होणार आहे. तरीही पवार हे बिटवीन द लाइन बोलत असतात, त्यांनी कितीही गुप्त बैठका घ्याव्यात, तरीही काहीही परिणाम होणार नाही, २०२४ मध्येही भाजपाचेच सरकार येणार आहे, असे फडणवीस म्हणाले. राज्याच्या निवडणुकीत भाजपाचा ७० टक्के स्ट्राइक रेट होता, सेनेचा केवळ ३५ टक्के होता, त्यामुळे जनतेने कुणाला नाकारले हे स्पष्ट होत आहे, असेही फडणवीस म्हणाले.

(हेही वाचा मुख्यमंत्र्यांना 22 दिवसांनी डिस्चार्ज, आदित्य ठाकरेंसोबत ‘वर्षा’वर दाखल)

गुजरातच्या मुख्यमंत्र्यांना विरोध का?

कोणताही मुख्यमंत्री आला, तरीही उद्योग बाहेर जात नसतात, ममता बॅनर्जी महाराष्ट्रात उद्योग क्षेत्रासाठी आल्या नाहीत, तर त्यांचा राजकीय अजेंडा होता. सरकार ममता बॅनर्जी यांचे स्वागत करते, पण गुजरातचे मुख्यमंत्री यांना विरोध करत आहे. सरकारची ही दुटप्पी भूमिका आहे, असे फडणवीस म्हणाले. आता मतांच्या लाचारीसाठी हिंदुत्वावादी विचाराच्या पक्षांना डोक्यावर घेऊन फिरावे लागत आहे, असेही फडणवीस म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.