महाराष्ट्रात प्रौढांपेक्षा जास्त मतदारांनी मतदान केले. निवडणूक आयोगाने (Election Commission) आम्हाला सायंकाळी ५:३० वाजता मतदानाचे आकडे सांगितले. यानंतर, संध्याकाळी ५:३० ते ७:३० दरम्यान ६५ लाख मते पडली. २ तासांत ६५ लाख मतदान करणे अशक्य आहे. मतदाराला मतदान करण्यासाठी सुमारे ३ मिनिटे लागतात. जर तुम्ही गणित केले तर तुम्हाला आढळेल की, मतदारांनी पहाटे २ वाजेपर्यंत रांगेत उभे राहायला हवे होते, पण तसे झाले नाही. हे पूर्णपणे स्पष्ट आहे की, भारतीय निवडणूक आयोगाशी तडजोड करण्यात आली आहे. या व्यवस्थेत काहीतरी गडबड आहे, अशा शब्दांत काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी देशाबाहेर जाऊन देशाची बदनामी करणे सुरु ठेवले आहे. विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी अमेरिकेतील बोस्टनमध्ये रविवारी संध्याकाळी भारतीय डायस्पोराला संबोधित केले. त्या वेळी ते बोलत होते.
(हेही वाचा – IPL 2025, PBKS vs RCB : विराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक ५०+ धावा करणारा फलंदाज)
राहुल गांधी (Rahul Gandhi) हे २ दिवसांच्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. शनिवारी रात्री उशिरा राहुल गांधी अमेरिकेतील (America) बोस्टन (Boston) विमानतळावर उतरले. ते रोड आयलंड येथील ब्राउन विद्यापीठाला भेट देतील. तिथे ते प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधतील, अशी माहिती काँग्रेस नेते पवन खेरा यांनी X वर दिली होती. यापू्र्वीही राहुल गांधी यांनी अमेरिका दौऱ्यावर असतांना भारताविषयी वादग्रस्त विधाने केली होती.
विद्य़ार्थ्यांना संबोधित करतांना राहुल गांधी पुढे म्हणाले की, जेव्हा आम्ही निवडणुकीची व्हिडिओग्राफी मागितली तेव्हा आयोगाने स्पष्टपणे नकार दिला. इतकेच नाही तर त्यांनी कायदाही बदलला जेणेकरून आम्ही व्हिडिओबद्दल पुढील प्रश्न विचारू शकणार नाही.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Assembly Elections) मतदारांची फसवणूक केल्याचा आरोप काँग्रेस (Congress) खासदार राहुल गांधी यांनी केला होता. या वर्षी फेब्रुवारीमध्ये एका पत्रकार परिषदेत राहुल गांधी म्हणाले होते की, महाराष्ट्र निवडणुकीत हेराफेरी झाली आहे. भाजप जिंकू शकेल म्हणून मतदार यादीत नवीन मतदार समाविष्ट करण्यात आले. राहुल (Rahul Gandhi) यांनी निवडणूक आयोगाकडून मतदारांचा डेटा मागितला होता.
हेही पहा –