Rahul Gandhi देशातील नंबर वन दहशतवादी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य

132
राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी शीखांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला आहे. शीख कोणत्याही पक्षाशी संबंधित नाहीत, पण त्यांना भडकवण्याचा प्रयत्न केला जात आहे. राहुल गांधी हे देशातील नंबर वन दहशतवादी आहेत. जे लोक नेहमी मारण्याच्या गप्पा मारतात, जहाजे आणि रेल्वे उडवून देण्याची भाषा करतात… ते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या समर्थनार्थ पुढे आले आहेत. अशा परिस्थितीत तुम्ही अंदाज लावू शकता. माझ्या मते जर कुणाला पकडल्याबद्दल बक्षीस द्यायचे असेल तर ते राहुल गांधी आहेत. राहुल गांधी हे देशाचे सर्वात मोठे शत्रू आहेत, असे केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते रवनीत सिंग बिट्टू म्हणाले.
रवनीत सिंग बिट्टू म्हणाले, ‘राहुल गांधी (Rahul Gandhi) भारतीय नाहीत, त्यांनी आपला बहुतांश वेळ बाहेर घालवला आहे. परदेशात जाऊन सर्व काही चुकीचे बोलतात म्हणून त्यांना आपल्या देशावर फारसे प्रेम नाही. जे मोस्ट वॉन्टेड दहशतवादी, फुटीरतावादी, बॉम्ब, बंदुका आणि स्फोटके बनवण्यात माहिर आहेत, त्यांनी राहुल गांधी यांच्या वक्तव्याचे कौतुक केले आहे. राहुल गांधी पहिल्यांदाच संसदेतील विरोधी पक्षनेते झाले आहेत. कधी ते शीखांच्या असुरक्षिततेबद्दल बोलतात तर कधी समाजाच्या विघटनाबद्दल बोलतात. त्यांचे असे वर्तन माफ करण्यालायक नाही.
बिट्टू म्हणाले की, राहुल गांधी यांना गांभीर्य नाही. राहुल गांधी (Rahul Gandhi) असोत वा त्यांच्या पक्षाचे इतर नेते, सगळेच देश तोडण्यात गुंतले आहेत. काँग्रेसला देशाच्या सुरक्षेची आणि कोट्यवधी लोकांच्या हिताची अजिबात चिंता नाही. केवळ मतांसाठी काँग्रेस समाजात अशांतता पसरवण्यात गुंतली आहे. मी काँग्रेसला खूप जवळून पाहिले आणि तपासले आहे. मी काँग्रेसच्या तिकिटावर तीन वेळा खासदार झालो आहे. पंतप्रधान मोदींची लोकप्रियता आणि भाजपच्या मूलभूत तत्वांनी प्रभावित होऊन आपण भाजपमध्ये प्रवेश केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारमध्ये सामील होऊन मी रेल्वेच्या क्षेत्रात देशवासीयांची सेवा करत आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.