राहुल गांधींना आणखी एक धक्का: लोकसभा हाऊस कमिटीने बजावली ‘ही’ नोटीस

65

२०१९ साली लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी काँग्रेस नेते राहुल गांधींनी कर्नाटक दौऱ्यातील एका सभेत ‘सर्व चोरांची आडनाव मोदी कशी काय असतात?’ असा सवाल उपस्थित केला होता. याच वक्तव्यावरून गुरुवारी, २३ मार्चला गुजरातमधील सुरत जिल्हा आणि सत्र न्यायालयाने राहुल गांधींना दोन वर्षांनी शिक्षा सुनावली होती. त्यानंतर शुक्रवारी, २४ मार्चला लोकसभा सचिवालयाने राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याचा निर्णय घेऊन काँग्रेसला धक्का दिला. आता लोकसभा हाऊस कमिटीने शासकीय बंगला रिकामा करण्याची नोटीस देऊन राहुल गांधींना आणखी एक धक्का दिला आहे.

लोकसभा हाऊस कमिटीच्या नोटीशीनंतर राहुल गांधी आता ३० दिवसांत दिल्लीतील १२, तुगलन लेन येथील शासकीय बंगला रिकामा करावा लागणार आहे.

दरम्यान राहुल गांधींना दोन वर्षांची शिक्षा सुनावलेल्या सुरत न्यायालयाच्या निकालाविरोधात काँग्रेसने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवरील सुनावणी प्रलंबित असताना शासकीय बंगला रिकामा करण्याची नोटीस राहुल गांधींना बजावली आहे.

भाजप आमदाराने राहुल गांधीविरोधात मानहानी खटला केला होता दाखल 

दरम्यान २०१९ साली लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी काँग्रेस नेते राहुल गांधींनी कर्नाटक दौऱ्यावेळी एका सभेत मोदींच्या नावाचा उल्लेख करत ललित मोदी, नीरव मोदी यांची नावे घेतली होती आणि सर्व चोरांची आडनाव मोदी कशी काय असतात?, असा सवाल केला होता. याप्रकरणी भाजप आमदार पूर्णेश मोदी यांनी राहुल गांधींविरोधात मानहानीचा खटला दाखल केला होता. त्याच संदर्भात गुरुवारी, गुजरातमधील सुरत जिल्हा आणि सत्र न्यायालयानं राहुल गांधींना दोन वर्षांनी शिक्षा सुनावली होती. मात्र, याप्रकरणात राहुल गांधींना तात्काळ जामीन मंजूर झाला होता. परंतु लोकप्रतिनिधी कायद्यातील तरतूदीनुसार शुक्रवारी राहुल गांधींची खासदारकी रद्द करण्यात आली.

(हेही वाचा – सत्तेला लाथ मारायची उद्धव ठाकरेंमध्ये हिंमत नाही – देवेंद्र फडणवीस)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.