छत्रपती शिवाजी महाराजांचा Rahul Gandhi यांच्याकडून जाणीवपूर्वक अवमान; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हल्लाबोल

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आहे. संपूर्ण महाराष्ट्राचा अपमान आहे.

233
छत्रपती शिवाजी महाराज यांची १९ फेब्रुवारीला जयंती असून सोशल मीडियावर महाराजांना अभिवादन केले जात आहे. मात्र काँग्रेस नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी मात्र महाराजांना श्रद्धांजली वाहून त्यांचा अवमान केला आहे.त्यांच्या या वादग्रस्त पोस्टने खळबळ उडाली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तर राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी जाणीवपूर्वक महाराजांचा अवमान केला आहे, अशा शब्दांत लक्ष्य केले आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आहे. संपूर्ण महाराष्ट्राचा अपमान आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा राहुल गांधी (Rahul Gandhi) वारंवार अपमान करत आले आहेत. आता त्यांची मजल छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापर्यंत पोहोचली आहे. हे तमाम शिवभक्तांचा अपमान आहे. हे चुकून झालेले नाही. हे त्यांची जीभ घसरलेली नाही, तर हे त्यांनी जाणीवपूर्वक केलेले विधान आहे. त्यांनी केलेल्या या विधानावर त्यांनी माफी मागायला पाहिजे. काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त ट्विट करत विनम्र ‘श्रद्धांजली’ अर्पण केल्याने वादाला तोंड फुटले आहे. श्रद्धांजली या शब्दामुळे राहुल गांधी यांच्यावर टीका केली जात आहे. तसेच हे मुद्दाम केलेले विधान असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. राहुल गांधी हे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा देखील अनेकवेळा अपमान करताना दिसतात. आता त्यांची मजल छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत गेली असल्याची टीका शिंदे यांनी केली.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.