काँग्रेस (Congress) नेते खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) दि. ६ मार्च रोजी धारावी (Dharavi) दौऱ्यावर आले होते, त्यावेळी त्यांनी धारावीतील लघुउद्योजकांशी संवाद साधण्याची नौटंकी केली. त्याचे वर्णन स्लम टुरिझम याच शब्दात करता येईल, असे म्हणत शिवसेना उपनेते राहुल शेवाळे (Rahul Shewale) यांनी राहुल गांधींचा (Rahul Gandhi) खरपूस समाचार घेतला.
( हेही वाचा : खासदार Dr. Shrikant Shinde यांचा ‘शिवसंवाद दौरा’ सुरू; महापालिका निवडणुकीपूर्वी पक्ष बळकटीसाठी रणनीती)
तसेच शेवाळे म्हणाले की, गेल्या ४ दशकांपासून धारावी विधानसभा मतदारसंघावर (Dharavi Assembly Constituency) गायकवाड परिवाराच्या माध्यमातून काँग्रेसची एकहाती सत्ता आहे. तरीही त्यांना धारावीकरांचे दुख, त्यांचा संघर्ष, त्यांचं द्रारिद्रय दिसलं नाही का? तेव्हा तुम्हाला त्यांचा पुनर्विकास करावासा का नाही वाटला? असा प्रश्नही राहुल शेवाळेंनी (Rahul Shewale) राहुल गांधींना (Rahul Gandhi) केला.
पुढे राहुल गांधींवर (Rahul Gandhi) टीका करत शिवसेना उपनेते राहुल शेवाळे (Rahul Shewale) म्हणाले की, झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांचं हालाखीचं जीवन, त्यांचा दैनंदिन संघर्ष, प्रतिकूल परिस्थितीत जगणारी माणसं, हृदय पिळवटून टाकणारे दारिद्र्य या साऱ्याचा अनुभव घेण्यासाठी दरवर्षी लाखो परदेशी पर्यटक धारावीला भेट देतात. हे पर्यटक काही तासांसाठी धारावीकरांचे हलाखीचे जीवन अगदी जवळून पाहतात, या संघर्षमय जीवनाचा थोडा अनुभव घेतात. मात्र, या पर्यटकांना प्रत्यक्षात धारावीकरांविषयी आत्मियता असेलच असे नाही. अगदी तशीच मनःस्थिती राहुल गांधी यांची आहे. एका मोठ्या घराण्यात जन्मलेल्या राहुल गांधी यांनी युवराजसारखे जीवन व्यतीत केले आहे. गरिबांच्या जीवनातील संघर्षाविषयी ते अनभिज्ञ आहेत. त्यामुळे एखाद्या परदेशी पर्यटकाप्रमाणे धारावीतील गरिबी, दारिद्र्य जवळून पाहण्यासाठी त्यांनी इथला दौरा केला असावा.
धारावीतील जनता राहुल गांधींचा (Rahul Gandhi) हा डाव कधीच यशस्वी होऊ देणार नाही, याची मला एक धारावीकर म्हणून खात्री आहे. मुळात गांधींची स्लम टुरिझमची (Slum tourism) खोड जुनी आहे. याआधीही त्यांनी धारावीत असेल दौरे करून राजकारण करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला होता. मात्र दरवेळी स्थानिकांनी त्यांना त्यांची जागा दाखवून दिली आहे. तसेच धारावी पुनर्विकास प्रकल्पाला मिळालेला वेग पाहून या प्रकल्पाला सातत्याने विरोध करणाऱ्या काँग्रेसचे (Congress) धाबे दणाणले आहेत. धारावीचा पुनर्विकास झाला तर स्थानिकांचा सर्वांगीण विकास होईल आणि गायकवाड घराण्याची पर्यायाने काँग्रेसची हुकूमशाही संपुष्टात येईल, हे स्पष्ट आहे. या भीतीपोटीच राहुल गांधींचा (Rahul Gandhi) हा दौरा आयोजित करण्यात आला असावा, असे म्हणत शेवाळे (Rahul Shewale) यांनी काँग्रेसचा समाचार घेतला.
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community