शरद पवार शिवरायांचे नाव कधी घेत नाहीत! राज ठाकरेंचा गंभीर आरोप

109

राष्ट्रवादी जातीवादी आहे असे बोललो तर केवढे झोंबले. १९९९ साली एनसीपीचा जन्म झाला, तेव्हापासून आमच्या तरुणांची माथी भडकावण्यात येऊ लागली. राष्ट्रवादीच्या जन्मानंतर संभाजी ब्रिगेडसारख्या संघटना कशा निर्माण झाल्या, पवार जेव्हा भाषण करतात तेव्हा ते महाराष्ट्र हा शाहू, फुले, आंबेडकरांचा असेच म्हणतात, पण हा महारष्ट्र सगळ्यात आधी शिवरायांचा आहे, पवार कधीच छत्रपतींचे नाव घेताना दिसत नाहीत, कारण त्यांचे नाव घेतले तर मुसलमानांची मते गेली तर याची त्यांना चिंता वाटते, असा गंभीर आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावर केला.

(हेही वाचा ‘वसंतसेना ते शरदसेना’ असा शिवसेनेचा प्रवास! संदीप देशपांडेंनी घेतला समाचार)

शिवरायांच्या हातातील भगवा झेंडा पवारांना दिसत नाही का? 

गुढीपाडव्याच्या सभेनंतर राज ठाकरे यांच्यावर टीका होऊ लागली त्याचे उत्तर देण्यासाठी ठाण्यात उत्तरसभेचे आयोजन करण्यात आले, त्यावेळी राज ठाकरे यांनी बिनधास्तपणे टीकाकारांना सडेतोड शब्दांत सुनावले. शिवरायांच्या नावावर राजकारण करायचे असेल, तर मग ब्राह्मणांनी शिवरायांवर लिहिलेली पुस्तके काढायची. अफझल खान महाराष्ट्रात कशाला आला होता, तो काय केसरी टूरमधून आला होता का, शिवरायांनी शपथ घेतली, तेव्हा हातात भगवा ध्वज घेतला होता, हिरव्या झेंड्याच्या विरोधातील भगवा झेंडा दिसला होता, हे पवारांना दिसत नाही का, असेही राज ठाकरे म्हणाले.

पवार नास्तिक, धर्माकडे नास्तिकतेच्या नजरेने पाहतात! 

स्वतः शरद पवार नास्तिक आहेत, त्यामुळे ते धर्माकडे नास्तिकतेच्या नजरेतूनच पाहतात आणि मग ते त्यांच्या पद्धतीने राजकारण करतात. त्यासाठी बाबासाहेब पुरंदरे सॉफ्ट टार्गेट. त्यांनी चुकीचा इतिहास लिहिला म्हणून बोंबा ठोकायच्या. त्यांचे इतिहासकार कोण कोकाटे, कोण हे कोकाटे? सर्वांनी शिवरायांवर लिहिले आहे, पण घराघरात शिवराय बाबासाहेब पुरंदरे यांच्यामुळे पोहचले. आम्हाला ते पुस्तक कोणत्या जातीच्या व्यक्तीने लिहिले हे सांगितले जाते. पेशव्यांनी अमुक केले, तमुक केले, काय चालले आहे महाराष्ट्रात. या सगळ्या गोष्टी थांबवण्याची जबाबदारी पवारांची होती.

(हेही वाचाः भाजपसहित सगळ्यांची ऑफर होती! वसंत मोरेंची जाहीर कबुली  )

महाराष्ट्रात जातीपातीचा चिखल 

जातीपातीचा चिखल महाराष्ट्रात घडत आहे, त्यातून बाहेर पडा. ही सर्व मंडळी तुमचा केवळ राजकारणासाठी वापर करत आहेत. निवडणुकीसाठी त्यांना उचकावयाचे होते, आता ओबीसी समाजावरून राजकारण करत आहेत. सव्वाशे वर्षे मराठेशाहीने, शिवरायांनी अठरा पगड जातीच्या लोकांना जवळ आणले होते, महाराष्ट्राच्या संतांकडून आपण काय घेतले. आज शाळा महाविद्यालयांत मुले एकमेकांकडे जातीने पाहात आहेत. महारष्ट्राला फक्त जात हरवत आहे, जातीतून बाहेर पडणार नसाल तर मराठी कधी होणार आणि मराठी झालो नाही तर हिंदू कसे होणार? या भामट्यांपासून दूर व्हा, कुणाला कशाची चिंता नाही. ५ महिने एसटीचा संप संपत नाही, तोडगा निघत नाही. फक्त याला जेलमध्ये टाक, त्याला जेलमध्ये टाक. आज राज्यात लोडशेडींग सुरु आहे, कुणी बोलायला तयार नाही, असेही राज ठाकरे म्हणाले.

(हेही वाचाः आधी सभा साहेबांची, मग लग्न घरातले! वसंत मोरे ठाण्यात पोहचले)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.