Raj Thackeray यांच्या निशाण्यावर मुंब्रा; अतिरेकी संघटनांची यादीच वाचून दाखवली

या देशात लाखो चांगले मुसलमान राहतात, त्यांना दंगली नको असतात पण त्यात मूठभर वाह्यात अवलादी आहेत. ज्यांनी पुण्यात फतवे काढले, ते काँग्रेस आणि उबाठालाच मतदान करा, असे म्हणत आहेत, असे राज ठाकरे म्हणाले.

195

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना रविवारी ठाण्यात महायुतीच्या सभेसाठी आमंत्रित केले होते. त्यावेळी राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी भाषणात थेट मुंब्र्यात सुरु असलेल्या दहशतवादी कारवाया आणि तिथे राहत असलेल्या अतिरेक्यांच्या विषयाला हात घातला. त्यावेळी त्यांनी आजवर तेथून अटक करण्यात आलेल्या अतिरेक्यांची आणि त्यांच्या संघटनांच्या नावाची यादीच वाचून दाखवली.

…म्हणून काँग्रेसला मते देण्यासाठी फतवे निघाले

या देशात लाखो चांगले मुसलमान राहतात, त्यांना दंगली नको असतात पण त्यात मूठभर वाह्यात अवलादी आहेत. ज्यांनी पुण्यात फतवे काढले, काँग्रेस आणि उबाठालाच मतदान करा, असे म्हणाले. कारण १० वर्षांत वाह्यातपणा करण्यासाठी त्यांना डोके वर काढता आले नाही,  ती त्यांची तडफड आहे. हा या देशाच्या सुरक्षेचा विषय आहे, असे राज ठाकरे (Raj Thackeray) म्हणाले.

(हेही वाचा पाकिस्तान POK वरील नियंत्रण गमावतोय; भारतात विलीन होण्यासाठी नागरिकांचा उठाव)

फक्त मुंब्र्यातून किती अतिरेक्यांना अटक केली. त्या बातम्यांची यादीच मी वाचवून दाखवतो. ज्यात लष्कर ए तोयबा, सिमी, पीएफआय, आयएसआय, आयसिस या संघटनेच्या अतिरेक्यांना अटक केली. हे सगळे आपल्या आजूबाजूला घडते आहे. त्यांना डोके वर काढण्यासाठी त्यांना काँग्रेसला पाठिंबा द्यायचा आहे. यांच्यात चांगला मुसलमान भरडला जाणार नाही हे लोकप्रतिनिधीने पाहिले पाहिजे. विकासासोबत सुरक्षा या विषयाकडेही लोकप्रतिनिधींनी गांभीर्याने पहावे, असेही राज ठाकरे (Raj Thackeray) म्हणाले.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.