देशात समान नागरी कायदा लागू करण्याची वेळ आली! राजनाथ सिंग यांचे महत्वाचे विधान

121

मोदी सरकार देशात सामान नागरी कायदा लागू करेल, अशी अधूनमधून चर्चा सुरु असते, पण अधिकृतपणे सरकारमधील कुणी मंत्री यांनी भाष्य केले नाही, पण प्रथमच मोदी सरकारमधील महत्वाचे मंत्री केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी देशात समान नागरी कायदा लागू करण्याची वेळ आली आहे, असे म्हणाले.

काय म्हणाले राजनाथ सिंग?

आता भारतात समान नागरी संहिता लागू करण्याची वेळ आली आहे. सर्व राज्यांनी याचा विचार करावा. ज्यांनी या कायद्याची अंमलबजावणी केली असेल किंवा करणार असतील, अशा राज्यांचे मी अभिनंदन करतो. यावेळी दिल्लीतील श्रद्धा हत्याकांडावर प्रतिक्रिया व्यक्त करताना राजनाथ सिंह म्हणाले की, हा अत्यंत घृणास्पद गुन्हा आहे. दोषीला कठोर शिक्षा झाली पाहिजे. फक्त गुजरातमध्येच नव्हे तर केंद्रातही मोदी सरकार पुन्हा येणार आहे. आम्ही आमच्या कामगिरीच्या आधारावर गुजरात जिंकतो आहे. मल्लिकार्जुन खर्गे यांचे पंतप्रधानांवरील वक्तव्य अत्यंत चुकीचे आहे. राजकारणात प्रतिष्ठा असली पाहिजे, असेही मंत्री सिंग म्हणाले.

(हेही वाचा ब्रिटनभोवती मुसलमानांचा विळखा, नव्या जनगणनेत धक्कादायक आकडेवारी समोर…)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.