भाजपच्या शिष्टमंडळाची निवडणूक आयोगाकडे धाव, तीन मते रद्द करण्याची मागणी

86
राज्यसभेच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण झाली, मात्र त्यानंतर लागलीच भाजपने तीन मतांवर आक्षेप घेतला, केंद्रीय निवडणूक आयोगानेही याची दखल घेतली. त्यानंतर मतमोजणी प्रक्रिया होणार तितक्यात भाजपचे शिष्टमंडळ केंद्रीय निवडणूक आयोगाकडे गेले आणि आयोगाने हे मतमोजणी प्रक्रिया थांबवली. तसेच मतदान प्रक्रियेचा व्हिडिओ मागवला आहे. यामुळे आक्षेप घेतलेली महाविकास आघाडीची तीन मते अडचणीत आलेली आहेत.

मतदान प्रक्रियेचा व्हिडीओ मागितला 

भाजपणे घेतलेल्या आक्षेपाची दाखल केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतली आहे. भाजपचे आमदार पराग अळवणी यांनी महाविकास आघाडीच्या तीन मतांवर आक्षेप घेतला होता. त्यामध्ये सुहास कांदे, जितेंद्र आव्हाड आणि  यशोमती ठाकूर या तीन आमदारांनी त्यांची मतपत्रिका पोलिंग एजंटला दाखवली, असा आक्षेप घेतला होता. त्यामुळे ही मते रद्द करण्यात यावीत, अशी मागणी केली होती. त्यानुसार केंद्रीय निवडणूक आयोगाणे याची दखल घेत त्यांनी मतदान प्रक्रियेतील व्हिडीओ क्लिप मागवली आहे. त्यामुळे आता मतमोजणी प्रक्रिया थांबलेली आहे. त्यात जर महाविकास आघाडीतील तीन मते रद्द झाली तर याचा फटका महाविकास आघाडीला बसण्याची शक्यता आहे. तरीही ऐनवेळी एनसीपीचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांच्या आमदारांना उरलेली मते देण्याच्या निर्णय घेतला, तसाच निर्णय काँग्रेसनेही घेतला होता, त्यामुळे दोन्ही  उमेदवार निवडून येतील, शिवसेनेचे संजय पवार यांची अडचण वाढणार आहे. आधीच एनसीपीची नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना मतांचा अधिकार नाकारण्यात आला होता, तर शिवसेनेचे रमेश लटके दिवंगत झाल्याने एक मत कमी झाले आहे.

तीन राज्यातील मतमोजणी थांबली 

केवळ महाराष्ट्राचीच नाही तर राजस्थान आणि हरियाणा येथीलही मतदान प्रक्रियेविषयी तक्रारी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आल्याने या तिन्ही राज्यांतील राज्यसभेच्या निवडणूक मतमोजणीची प्रकीया थांबवण्यात आली आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.