कितीही दावे झाले तरी निकालानंतरच कळणार अपक्षांची साथ कोणाला?

91
राज्यसभा निवडणूक आता अंतिम टप्प्यावर येऊन ठेपली आहे. मविआ आणि भाजप यांनी त्यांच्या त्यांच्या आमदारांना सोबत ठेवले आहे, तर दुसरीकडे छोट्या पक्षांची मते मिळवण्यासाठी जोरदार बॅटिंगही सुरु केली आहे. या सगळ्यात अपक्षांची मते मात्र गेम चेंजर म्हणून काम करणार आहेत. त्यांना त्यांचे मत कुणाला दिले हे सांगणे कायद्याने बंधनकारक नसल्याने अपक्ष आमदारांची मते कायम अधांतरित असणार आहेत. ती मते नक्की कोणाला मिळाली हे कोणालाच कळणार नाही. शेवटी निवडणुकीचा निकाल लागल्यावरच त्यांची मते कोणाला मिळाली याचा अंदाज घेता येणार आहे.

१३ अपक्ष ठरवणार सहावा खासदार!

महाराष्ट्राच्या विधानसभेत एकूण १३ अपक्ष आमदार आहेत. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसकडे २६ अतिरिक्त मते आहेत. त्यांचा उमेदवार निवडून आणण्यासाठी त्यांना १६ मतांची गरज आहे. तर भाजपाकडे २२ अतिरिक्त मते असून अन्य ७ आमदारांचा पाठिंबा आहे. असे एकूण २९ मते त्यांच्याकडे आहेत. त्यामुळे भाजपला १३ मतांची गरज आहे. हे गणित लक्षात घेता अपक्षांची १३ मते कुणाला जातील त्यावर त्या उमेदवारांचा विजय निश्चित होणार आहे. विशेष म्हणजे अपक्ष कोणत्याही पक्षाशी संबंधित नसतात, त्यामुळे त्यांना मतदान केल्यावर ते कोणाला दाखवणे बंधनकारक नसते. त्यामुळे जरी महाविकास आघाडीच्या ट्रायडेंट हॉटेलमध्ये झालेल्या संयुक्त बैठकीत ११ अपक्ष आमदारांनी हजेरी लावल्याचा दावा महाविकास आघाडी करत असली तरी त्यांची उपस्थिती मतांमध्ये रूपांतरित होईलच, याची अजिबात शाश्वती नाही. त्यामुळे आता अपक्षांचा खेळ काय असणार, हे निवडणुकीनंतरच कळणार आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.