Raj Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेनाचे प्रमुख राज ठाकरे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. एका १७ वर्षे जुन्या प्रकरणामध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने (Aurangabad Bench of Bombay High Court) पुराव्याअभावी त्यांची निर्दोष मुक्तता केली आहे. हे प्रकरण २००८ सालचे एका आंदोलनाचे होते. घटनेच्यावेळी राज ठाकरे घटनास्थळी हजर नव्हते, त्यांनी बसवर दगडफेक केल्याचा व आंदोलनकर्त्यांना चिथावणी दिल्याचा कुठलाही पुरावा दोषारोपपत्रात नाही, असे न्यायालयाने म्हटले. (Raj Thackeray)
कुठलाही पुरावा नसल्यामुळे राज ठाकरेंविरुद्ध फौजदारी खटला चालविणे म्हणजे कायदेशीर प्रक्रीयेचा गैरवापर ठरेल, असे निरीक्षण नोंदवीत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या न्या. विभा कंकणवाडी (Justice Vibha Kankanwadi) आणि न्या. संजय देशमुख (Justice Sanjay Deshmukh) यांनी राज ठाकरे यांच्याविरुद्ध ‘सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याबाबत’ दाखल गुन्हा आणि दोषारोपपत्र रद्द करुन त्यांची निर्दोष सुटका केली.
(हेही वाचा – Operation Brahma : भारताने 55 टन जीवनावश्यक साहित्य पाठवले म्यानमारला)
काय आहे प्रकरण?
२००८ साली राज ठाकरे यांच्या अटकेनंतर उसळलेल्या दंगलीत परळी- गंगाखेड मार्गावर एस टी बस थांबवून दगडफेक केल्याबाबत राज ठाकरेंसह मनसे कार्यकर्त्यांविरोधात सार्वजनिक मालमत्तेस नुकसान पोचवल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा गुन्हा रद्द करण्यासाठी राज ठाकरेंनी परळीच्या प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. या अर्जाच्या सुनावणीअंती खंडपीठाने दि.२१ मार्च रोजी वरीलप्रमाणे आदेश दिला आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community