गुडघ्यात ज्यांची अक्कल त्यांनी अक्कल दाढेवर बोलू नये, मनसेचे राऊतांना सडेतोड उत्तर

115

शनिवारी गुढीपाडव्याच्या निमित्ताने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसेचा पाडवा मेळावा घेतला. या मेळाव्यासाठी राज्यभरातून हजारो मनसैनिकांनी शिवाजी पार्कवर हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीवर सडकून टीका केली. यावर राऊतांनी पलटवार करत शनिवारच्या भाषणावरुन समजते की काहींना अक्कल दाढ उशिरा येते असे म्हटले. आता यावर मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी सडेतोड उत्तर देत म्हटले की ज्यांची अक्कल गुडघ्यात आहे त्यांनी अक्कल दाढेवर बोलू नये. सध्या ते बिझी आहेत. अनेक जमिनी अलिबागमध्ये आहेत. त्यांचा हिशोब ईडीला द्यायचा आहे. हजारो कोटी मनपाचे खाल्ले त्याचा हिशोब त्यांना द्यायचा आहे आणि राज ठाकरे काल जे बोलले ते झोंबलेले दिसत आहे. संजय राऊतांचा भोंगा तर रोज सकाळी 9 वाजता वाजतोच. त्यांना काय एवढे महत्त्व द्यायचे असे संदीप देशपांडे म्हणाले.

आधी स्वत:चा चेहरा आरशात पाहा

राष्ट्रवादीने सत्तेत आल्यानंतर जातीचे राजकारण केल्याचे म्हटले. आता मनसे नेते संदिप देशपांडे यांनीही शरद पवार यांचे नाव न घेता टीका केली आहे. ज्यांनी यशवंतराव चव्हाणांच्या पाठीत खंजीर खुपसला, कधी काँग्रेसमध्ये कधी काँग्रेसच्या बाहेर, 1999 मध्ये परदेशी च्या मुद्द्यांवर वेगळा पक्ष, 2014 मध्ये न मागता भाजपला पाठिंबा, 2019 मध्ये थेट शिवसेनेच्या मांडीवर, आमच्या भूमिकेवर टीका टिप्पणी करण्याआधी स्वतःचा चेहरा आरश्यात नक्की बघा! अशी टीका संदिप देशपांडे यांनी ट्विटरवरुन केली आहे.

( हेही वाचा: आकाशातून आगीचा गोळा पडला विदर्भातील या गावात …पाहा फोटो )

त्यांची विचारसरणीच भोंग्यांची

संजय राऊत यांनी राज ठाकरे यांच्यावर शनिवारी केलेल्या भाषणावरुन टीका केली. राऊत म्हणाले, कालच्या भाषणावरुन समजले की अक्कल दाढ उशिरा येते. त्यावर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी सडेतोड उत्तर देत राऊत यांचा भोंगा रोज सकाळी चालू असतो. त्यामुळे त्यांची विचारसरणीच तशी आहे. असे देशपांडे म्हणाले आहेत.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.