सकाळी 8 ला वाजणारा भोंगा बंद झाला; मुख्यमंत्र्यांचा संजय राऊतांना टोला

95

शिवसेना नेते संजय राऊत यांना ईडीने अटक केली आहे. त्यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टोला लगावला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे औरंगाबाद दौ-यावर आहेत. रविवारी रात्री ते एका जाहीर सभेत बोलत होते. तेव्हा त्यांनी, अरे भोंगा नीट करा…. माझा आवाज येतोय का? आता आवाज येणारच नाही. सकाळी 8 वाजता वाजणारा भोंगा आता बंद झाला. भोंगा आत गेला, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

लोक चौका चौकामध्ये हजारोंच्या संख्येने लोक प्रतिसाद देत होते. आम्ही जी काय भूमिका स्वीकारली ती बाळासाहेबांच्या विचारातूनच स्वीकारली आहे. बाळासाहेबांचा अजेंडा पुढे घेऊन जात आहोत. तो लोकांनी स्वीकारला आहे. म्हणूनच एवढा मोठ्या प्रमाणावर जनतेचा प्रतिसाद मिळत आहे, असेही एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.

( हेही वाचा: बाळासाहेब तुमचेच कसे? )

राऊतांना अटक ही सूडबुद्धीची कारवाई 

संजय राऊत यांना अटक करण्याची कारवाई ही सूडबुद्धी आहे. भाजप संजय राऊत यांना घाबरत आहे, त्यामुळे त्यांना अटक करण्यात आली आहे. ईडीने नेमक्या कोणत्या प्रकरणात अटक केली हे स्पष्ट केले नाही. ईडीने पत्रा चाळीचा उल्लेखही केला नाही, असे संजय राऊत यांचे भाऊ सुनील राऊत म्हणाले.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.